Pie muffin apple pie cookie. Bear claw cupcake powder bonbon icing tootsie roll sesame snaps. Dessert bear claw lemon drops chocolate cake. Cake croissant cupcake dragée wafer biscuit pudding bonbon.

Spread the loveMaharashtra Day 2025: संघर्ष, बलिदान आणि राजकारण! Maharashtra Day 2025 म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस नाही, तर तो मराठी अस्मितेचा आणि बलिदानाचा दिवस आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मुंबई ही त्याची राजधानी झाली. परंतु यामागे संघर्ष, रक्तपात, आणि हजारो आंदोलकांचे बलिदान दडलेले आहे. 📜 राज्य पुनर्रचनेचा कायदा आणि संघर्षाची सुरुवात १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना कायदा (States Reorganization Act) लागू झाला आणि भाषेच्या आधारे राज्यांची पुनर्रचना झाली. त्यामुळे मुंबई राज्य अस्तित्वात आले. पण, या नव्या राज्यात मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषिक लोक होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने ही मागणी केली की मराठी आणि कोकणी भाषिकांसाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र’, तर गुजराती आणि कच्छी भाषिकांसाठी ‘गुजरात’ हे राज्य निर्माण करावे. 🔥 21 नोव्हेंबर 1956: संघर्षाचा निर्णायक दिवस राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करू नये असा निर्णय दिला. या निर्णयाचा मराठी लोकांनी तीव्र विरोध केला. चर्चगेट आणि बोरीबंदर येथून निघालेला मोर्चा फ्लोरा फाउंटन येथे एकत्र आला. घोषणा देत आंदोलक एकवटले. पोलिसांनी लाठीचार्ज केला. सत्याग्रही हटले नाहीत. तेव्हा तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचा आदेश दिला. या गोळीबारात १०६ आंदोलक हुतात्मा झाले. 🕊️ हुतात्म्यांचे बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे सरकारवर दबाव आला आणि अखेर २५ एप्रिल १९६० रोजी बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 संसदेत मंजूर झाला. १ मे १९६० पासून महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली आणि हुतात्म्यांच्या त्यागाने मराठी जनतेच्या हक्काचा विजय झाला. 🏛️ हुतात्मा स्मारक आणि आजचा दिवस १९६५ साली फ्लोरा फाउंटन परिसरात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन ( Maharashtra Day 2025 )साजरा केला जातो. यावेळी राज्य सरकारकडून परेड, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि राजकीय भाषणे आयोजित केली जातात. 📣 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व – Maharashtra Day 2025 🧾 निष्कर्ष Maharashtra Day 2025 हा केवळ एक उत्सव नाही, तर एका मोठ्या लढ्याची आठवण आहे. मुंबई महाराष्ट्रात आली यामागे सामान्य मराठी जनतेचा संघर्ष आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे बलिदान आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. १ मे रोजी आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि शौर्याचा गौरव करण्याची हीच खरी वेळ आहे. Best Sunscreens in India: Top-Rated Picks for 2025 How to Get Rid of Acne Scars Naturally: Best Skincare Tips
Spread the loveआजवर अनेकांनी बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील घटनाक्रम सांगितला, त्याबद्दल भाष्य केलं पण सुरेश धस यांनी बीड हत्या प्रकरणाचा अतिशय तपशीलवार घटनाक्रम सांगून या पूर्ण घटनेची सर्वांना थक्क करून सोडणारी कहाणी सांगितली. त्यामुळे नक्की सुरेश धस त्यांच्या भाषणात काय म्हणालेत तेच पाहुयात. सुरुवातीला सुरेश धस यांनी बीड प्रकरणातील अगदी सुरवातीपासूनचा घटनाक्रम सांगत, विष्णू चाटे याच्या या प्रकरणातील इन्व्हॉल्व्हमेंट बद्दल भाष्य केलं. तर पुढे यांचा कोण आका आहे? असा सवाल देखील उपस्थित केला. तर यावर विरोधकांना उत्तर देत तुमच्याप्रमाणे आम्ही देखील या आकाच्या शोधात आहोत असं सुरेश धस म्हणाले. प्रकरणातील पुढील घटनाक्रम सांगताना सुरेश धस यांनी सुदर्शन घुले नामक इसमावर टीका केली व ज्याचं घर चार-पाच पत्र्याचं आहे तो स्कॉर्पिओ मध्ये कसा काय फिरू शकतो? त्याला स्कॉर्पिओ कोणी दिली हे शोधणं महत्त्वाचं आहे. असं म्हणत प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाबाबत पुढे बोलत असताना मी या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे आणि त्यानुसार या सगळ्यांनी एक प्लॅन केला असं म्हणत सुरेश धस यांनी आरोपींचा काय प्लॅन होता ते सांगितलं. यापुढे सुरेश धस यांनी या प्रकरणातील सर्वांना हादरवून टाकणारी कहानी सांगितली. तर बीड जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांकडे पिस्तूल आहेत, त्या त्या लोकांचे पिस्तूल आपण काढून घ्यावे यासाठी अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती केली. सुरेश धस यांनी त्यांच्या भाषणात या प्रकरणावरून ग्रामस्थांचा संताप का झाला, या मागील कारण देखील स्पष्ट केला आहे. अशाप्रकारे सुरेश धस यांनी बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मनाला अतिशय वेदना देणारी कहानी सांगत, भावनिक पद्धतीने भाषण दिले. तर यावर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा
Spread the loveधनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल: घटस्फोटाच्या चर्चेत एक नवीन वळण भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोटाच्या चर्चेवर सध्या खूप चर्चा होत आहे. अद्याप दोन्ही कडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, धनश्रीने युजवेंद्र कडून 60 कोटी रुपयांची पोटगी मागितली आहे. तथापि, युजवेंद्रकडून पैसे मिळाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा: घटस्फोट आणि पोटगीवरील अफवा युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सध्या 60 कोटी रुपयांच्या पोटगीच्या मागणीचा मुद्दा चर्चिला जात आहे. पण मीडियारिपोर्टनुसार, यामध्ये कोणताही तथ्य नाही. धनश्रीने पोटगी मागितली नसून, दोन्ही कडून घटस्फोटावर अद्याप अधिकृत वक्तव्य केलेले नाही. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा: पोटगीवरील चर्चेचा नवा दृषटिकोन युजवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने कौटुंबिक मूल्ये आणि चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आपले विचार व्यक्त केले होते. त्याने या पोस्टमध्ये पैशाच्या व्यवहाराबद्दल कोणताही उल्लेख केलेला नाही, ज्यामुळे सोशल मीडियावर उभी राहिलेली पोटगीवरील चर्चा निराधार ठरली आहे. धनश्रीने कोणतीही पोटगी मागितली नसल्याचे स्पष्ट झाले आहे, आणि त्यामुळे या चर्चेतील तथ्याचा प्रश्नही संपवला आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची नेट वर्थ आणि घटस्फोटाच्या चर्चेतील नवा वळण भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या संपत्तीमध्ये प्रत्येक दिवसाला वाढ होत आहे. सध्या त्याची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे, युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माची नेट वर्थ 23 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. तथापि, युजवेंद्र आणि धनश्री यांच्यातील मतभेदांचा कारण अजूनपर्यंत समोर आलेला नाही. युजवेंद्र चहलने काही काळापूर्वी आपल्या सोशल मीडियावर पत्नी सोबत असलेले सर्व फोटो डिलिट केले आहेत. याशिवाय, दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे, दोघांमध्ये लवकरच घटस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण या सर्व चर्चांवर, युजवेंद्र आणि धनश्री यांनी अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.