Santosh Deshmukh Murder Case:
Crime Updates ताज्या बातम्या

Santosh Deshmukh Murder Case: कराड दोषमुक्त? कायदेशीर लढा

Santosh Deshmukh Murder Case :बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज साधारण ६ महिने झाले असतील. पण या प्रकरणात गुन्ह्याची सिद्धता बाकी असल्याने आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाहीं. मंगळवारी बीडच्या विशेष न्यायालयात हि प्रकरणी सुनावणी पार पडली. Santosh Deshmukh हत्या प्रकरण – कायदा, राजकारण आणि न्यायालयीन लढाई या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्जवल निकम उपस्थित होते. Santosh Deshmukh हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी. अशी मागणी निकम यांनी न्यायालयाकडे केली. सोबतच गुन्ह्यातील सर्व आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करावेत असा युक्तिवाद यावेळी निकम यांनी केला. या प्रकरणात आरोपींशी संबंधीत सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत.असं निकम यांनी सांगितलं होतं यावर आरोपींच्या वकिलांनी हरकत घेतली होती. आणि आत्ताच आरोप निश्चित करता येणार नाहीत असा युक्तिवाद केला होता तसेच त्यांनी “वारंवार मागणी करून अजूनही आम्हाला डिजिटल पुरावे मिळाले नाहीत असे सांगितले. याबरोबरच मुख्य आरोपींवर लावण्यात आलेले मकोका कलम हटवण्यात यावे. म्हणजेच काय तर वाल्मिक कराडची मकोकातून मुक्तता करण्यात यावी आणि अगोदर या संदर्भात एक सुनावणी घेण्यात यावी. अशी मागणी आरोपींचे वकील विकास खाडे आणि मोहन यादव यांच्याकडून करण्यात आली आहे. मकोका काय आहे आणि तो इतका कठोर का मानला जातो? Santosh Deshmukh Murder Case या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर मकोकाच्या तरतुदी लागू होणार कि नाही हे 17 जूनला होणाऱ्या सुनावणीमधूनच कळेल.पण न्यायालयाने कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर पुढील सुनावणी 17 जूनला होणार असल्याचे सांगितले आहे. पण असा प्रश्न उपस्थित केला जातोय कि, वाल्मिक कराडने मकोकातून सुटकेसाठी अर्ज का केलाय? त्याला यातून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? कराड कोणत्या आधारावर मकोकातून मुक्त होण्याची शक्यता आहे? कराडची संपत्ती जप्त का करायला पाहिजे? एकूणच या प्रकरणामधील सर्व शक्यता आणि घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत! Santosh Deshmukh हत्या प्रकरणातील आरोपींची ओळख उघड झाली. संघटित गुन्हेगारी केल्यामुळे वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी करण्यात आलेला हा कायदा अत्यंत कठोर मानला जातो. एखाद्यावर कायदा लागू झाल्यानंतर आरोपीची सर्व मालमत्ता जप्त केली जाते. मकोका कायद्यामधील कलम 20 आणि IPC च्या तरतुदीनुसार आरोपींची संपत्ती जप्त होणे महत्वाचे ठरते. गुन्हेगारी प्रकार म्हणजेच खंडणी, धमकी आणि बेकायदेशीर व्यवसाय करून किंवा वसूलीतून संपत्ती मिळवली असेल तर ती बेकायदेशीर मानली जाते. वाल्मिक कराडवर त्याने कमावलेली संपत्ती ही संघटित गुन्हेगारीतून कमावली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी कराडच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या संपत्तीचे पुरावे दाखवले. वाल्मिक कराडकडे 2000 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं आमदार धस यांनी सांगितलं होत. ही सगळी संपत्ती जप्त करण्यात यावी! त्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात तसा अर्जही केला होता. आरोपींची लवकरात लवकर संपत्ती जप्त करण्याचा अर्ज करण्याचे कारण म्हणजे मालमत्ता जप्तीमुळे त्यांचे आर्थिक बळ कमी होईल. त्यांचे गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आणि तपासात अडथळा येणार नाही यासाठी तसेच आरोपींची संपत्ती लपवली जाऊ नये किंवा इतरांच्या नावे करणे किंवा विकू नये यासाठी न्यायालयाने संपत्ती जप्त करण्याचे आदेश द्यावेत. असा अर्ज सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता मात्र त्या अर्जावर सुनावणी होण्याअगोदरच वाल्मिक कराडला मकोकातून दोषमुक्त करा, असा अर्ज बचाव पक्षाने न्यायालयात सादर केला होता. या अर्जावर युक्तिवाद करण्यात यावा, त्यासंबंधीचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अशी विनंती बचाव पक्ष म्हणजेच आरोपींच्या वकिलांनी केली आहे. न्यायालयाने याच अर्जावर 17 जूनला पुढील सुनावणी होईल असं सांगितल आहे. राजकारणाचा संदर्भ आणि मुंडे कनेक्शन पण मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडने “मला मकोकातून दोषमुक्त करा” असा अर्ज का केला ? याबद्दल जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. आणि या चर्चेचे प्रमुख कारण म्हणजे वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवे हात मानल्या जातो. दोघे बिसनेस पार्टनर असल्याचेही बोलले जाते. दोघांची बरीच मालमत्ता एकत्र आहे ते अनेक कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत. धनंजय मुंडेची मोठी संपत्ती कराडच्या आणि त्याच्या परिवाराच्या नावावर आहे. जर मकोकाच्या नियमानुसार सगळी सगळी संपत्ति जप्त झाली तर वाल्मिक कराड पेक्षा मोठे नुकसान हे धनंजय मुंडे यांचे होईल. म्हणून हा अर्ज सादर केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात असे आणि यासारखे अनेक खुलासे सामाजिक कार्यकर्त्या अंजाली दमानिया यांनी केले आहेत. तसेच त्यांनी यासंदर्भात काही कायदेशीर कागदपत्रे दाखवली होती. वाल्मीक कराडची हजारो कोटींची संपत्ती जप्त होऊ नये यासाठीच त्याने मकोकातून दोषमुक्तीचा अर्ज केल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. शिवाय आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाल्यास मकोका अंतर्गत किमान पाच वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा होत असते. त्यामुळे पुढील सुनावणी सूनवणी दरम्यान वाल्मिक कराडची मकोकातून खरच सुटका होईल की काय? असा प्रश मागे उरला आहे.पण तुम्हाला माहीत आहे का ? एखाद्या आरोपीवर मकोका लागू झाल्यानंतर कोणत्या निकषांच्या आधारे त्याची दोषमुक्तता होऊ शकते. कराडचा दोषमुक्ततेसाठी प्रयत्न आणि कायद्यातील पळवाटा पहिलं कारण समोर येत ते म्हणजे पुरव्यांचा अभाव.. मकोका अंतर्गत दोषमुक्तीसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुराव्याची कमतरता, संबंधित प्रकरणामध्ये जरका सरकारी पक्ष आरोपींविरुद्ध ठोस आणि पुरेसे पुरावे सादर करू शकला नाही तर न्यायालय आरोपीला दोष मुक्त करू शकते. मकोका अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीशी संबंध, गुन्ह्याची नियमित पद्धत आणि गंभीर गुन्हे सर्वांचा परस्पर संबंध असल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट करावे लागते. त्यात दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कायद्यातील काही त्रुटी.. मकोका अंतर्गत खटला दाखल करण्यासाठी काही कायदेशीर गोष्टींचे पालन करावे लागते.जसे की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मंजुरी.. जर ही मंजुरी योग्य पद्धतीने घेतलेली नसेल किंवा प्रक्रियेमध्ये काहीचुका झाल्या असतील तर बचाव पक्ष या मुद्द्यावर आरोपींना दोषमुक्त करण्याची मागणी करू शकतो. तिसर कारण आहे.. साक्षीदारांचे खंडन म्हणजे न्यायालयात, एका साक्षीदाराने दिलेली साक्ष चुकीची किंवा खोट्या प्रकारे मांडलेली आहे. असे सिद्ध केले तर बचाव शक्य आहे. संपत्ती जप्तीमागे काय उद्देश आहे? मकोका लागू झाल्यानंतर आरोपींचा कबूली जवाब हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. परंतु जर कबूली जवाब सक्तीने घेतला असेल किंवा त्याची खात्री कमी असेल तर तो न्यायालयात टिकत नाही. यात मकोकातून दोषमुक्त होण्यासाठी बचाव पक्षाचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरतो. बचाव पक्षाला संधी असते की ते आरोपींच्या निर्दोषपणाचे पुरावे सादर करू शकतात किंवा सरकारी पक्षाच्या पुराव्यांना आव्हान देखील देऊ शकतात.यामध्ये आरोपी घटनेच्या वेकी गुणहयाच्या ठिकाणी नव्हता, साक्षीदारांचे खंडन करणे किंवा तांत्रिक त्रुटी दाखवणे अशा गोष्टींचा समावेश असतो. अशा प्रकरणामध्ये न्यायालयाचा निकालसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो, जितका वकिलांचा युक्तिवाद महत्वाचा ठरतो. मकोका अंतर्गत दाखल झालेला खटला हा विशेष मकोका कोर्टात चालवला जातो. जर सरकारी पक्ष ठोस पुरावा देत गुन्हा सिद्ध करू शकला नाही तर न्यायाधीश आरोपीला दोषमुक्त करू शकतात. एखाद्या आरोपीच्या दोषमुक्ततेचा निकाल हा पूर्णपणे पुराव्यांच्या सत्यातेचे मूल्यमापन, केसची कायदेशीर प्रक्रिया आणि आरोपींच्या साक्षीदारांच्या जबाबावर अवलंबून असतो. समजा आरोपीला मकोका अंतर्गत दोषी जरी ठरवण्यात आले तरीही तो उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतो. परंतु, उच्च न्यायालयात अपील करताना कायदेशीर चुका आणि पुराव्याचा अभाव दाखवावा लागतो. तसेच या प्रक्रियेतील चुका दाखवून

Valmik Karad's
Updates आजच्या बातम्या

Santosh Deshmukh हत्या प्रकरणात आरोपीची सुटका लांबणीवर

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच Santosh Deshmukh यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडची सुटका तूर्तास लांबणीवर पडली आहे. Discharge Application अर्थातच आरोपीवरील आरोपमुक्ती अर्जावर आज बीड येथील विशेष मोक्का कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय देत सुनावणी पुढे ढकलली असून आता पुढील कार्यवाही १७ जून २०२५ रोजी होणार आहे. न्यायालयीन कार्यवाहीत काय घडलं?आजच्या सुनावणीत वाल्मीक कराडच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या Discharge Application वर युक्तिवाद होणार होता. यावर सरकारी पक्षाचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार विरोध केला. त्यांनी नमूद केलं की, वाल्मीक कराडवर हत्येशी संबंधित इतरही गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे केवळ या एका अर्जावर निर्णय घेणं योग्य ठरणार नाही. कोर्टाचे निरीक्षण आणि निर्णयन्यायालयाने आपल्या निरीक्षणात नमूद केलं की, आरोपीवर इतरही गुन्हे असल्यामुळे सर्व अर्जांची एकत्रित सुनावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ Discharge Application वर ऐकणी न घेता, इतर दाखल अर्जांसह एकत्रित सुनावणी १७ जून रोजी घेण्याचा आदेश देण्यात आला. यामध्ये वाल्मीक कराडची मालमत्ता जप्ती, पंच साक्षीदारांना कोर्टात हजर करणे, इतर आरोपींच्या याचिका अशा अनेक अर्जांचा समावेश आहे. सरकारी पक्ष आणि विरोधकांची भूमिकासरकारी पक्षाने कोर्टासमोर ठामपणे मांडणी करत सांगितलं की, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून फक्त तांत्रिक मुद्द्यांवर आरोपीला सुटका देता येणार नाही. उज्वल निकम यांनी कोर्टाला कळवले की, या प्रकरणात अनेक पुरावे अजून सादर व्हायचे बाकी आहेत आणि तपास पूर्ण होण्याआधी आरोपीला डिस्चार्ज देणं हा अन्याय असेल. विरोधी पक्षाचे वकील मात्र या युक्तीवादास असहमत होते. त्यांनी कोर्टासमोर मांडलं की, वाल्मीक कराड निर्दोष असून त्याला खोट्या गुन्ह्यात गोवलं जात आहे. त्यांनी दिलेला Discharge Application हाच या प्रकरणातील त्याचा कायदेशीर हक्क आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची प्रतिक्रियाSantosh Deshmukh यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कोर्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं, “आम्हाला आमच्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सरकारी पक्ष उत्तम युक्तिवाद करत आहे. आमचं एकच मागणं आहे – संतोषच्या हत्येचा खरा गुन्हेगार शिक्षा मिळावी.” वाल्मीक कराडसाठी पुढचा टप्पातुरुंगात असलेल्या वाल्मीक कराडसाठी ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची होती. जर आजचा युक्तिवाद त्याच्या बाजूने गेला असता, तर त्याला तुरुंगातून सुटका मिळू शकली असती. मात्र, कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे त्याची अटक कायम राहणार असून त्याला आणखी काही काळ तुरुंगात राहावं लागणार आहे. पुढील कायदेशीर वाटचाल१७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत सर्व अर्ज एकत्र करून पुन्हा युक्तिवाद होईल. या सुनावणीत कोर्टाचे लक्ष सर्व पुराव्यांवर, अर्जांवर व आरोपींच्या भूमिकांवर असेल. त्यानंतरच Discharge Application बाबत अंतिम निर्णय होईल. Santosh Deshmukh हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न तूर्तास फसला आहे. न्यायालयाने सर्व अर्ज एकत्र करून सुनावणी घेण्याचा निर्णय घेतल्याने प्रकरण अधिक गंभीर व व्यापक स्वरूपात हाताळलं जाणार आहे. सरकारी पक्षाच्या ठाम भूमिकेमुळे आणि न्यायालयाच्या संतुलित निर्णयामुळे या प्रकरणात न्याय मिळण्याची आशा Santosh Deshmukh यांच्या कुटुंबाला आहे. पुढील सुनावणी १७ जून रोजी होणार आहे. त्या दिवशी या प्रकरणातील अनेक गुंतागुंतींचा निकाल लागण्याची शक्यता आहे. Santosh Deshmukh Murder Case मध्ये नियुक्ती झालेले Ujjwal Nikam कोण? Walmik Karad च्या अडचणी वाढणार?

Walmik karad
आजच्या बातम्या

Santosh Deshmukh Murder Case नवा ट्विस्ट – वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज

Santosh Deshmukh Case म्हणजे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अत्यंत चर्चेचा आणि गाजणारा खटला. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती. याच प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडने आता कोर्टात मोठा डाव टाकत स्वतःला निर्दोष ठरवण्याची मागणी केली आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी2024 मध्ये घडलेल्या या हत्येने राज्यभरात मोठा राजकीय आणि सामाजिक तणाव निर्माण केला होता. संतोष देशमुख हे मस्साजोग गावाचे सरपंच होते आणि त्यांच्या कार्यपद्धतीमुळे गावात त्यांचा प्रभाव होता. त्यांच्या मृत्यूनंतर पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. प्रकरणात एकूण 7 आरोपींना अटक झाली आहे. तर, कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड याने टाकलेला डाववाल्मिक कराड हा या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक मानला जातो. मात्र, केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात 9 एप्रिल रोजी झालेल्या दुसऱ्या सुनावणीत त्याने आपल्या वकिलामार्फत अर्ज सादर करत, “माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही, मी निर्दोष आहे”, असा दावा केला.त्याच्या म्हणण्यानुसार,त्याच्या प्रत्यक्ष सहभागाचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, खंडणीसंबंधीही त्याच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत,तसेच, साक्षीदारांच्या जबाबांमध्येही त्याचा थेट उल्लेख नाही. सरकारी पक्षाची बाजू – उज्ज्वल निकम यांचे विधानइन्ही खटल्यात सरकारीच्या बाजूने प्रसिद्ध विशेष सरकारी वकील Adv. उज्ज्वल निकम काम करत आहेत. सुनावण्यानंतर निकम यांनी माध्यमांशी तात्पुरता discourse साधताना सांगितले की, “वाल्मिक कराडने मागितलेली कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. त्याच्या सहभागावरूनच पुढील निर्णय घेतला जाईल.” निकम यांनी आगेच वचन नोंदवत ही देखील माहिती देताना नमूद केले आहे,संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ साक्षीस्वरूपात न्यायालयात दाखल करण्यात आला आहे, तसेच, मोक्का कायद्याअंतर्गत वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठीही एक स्वतंत्र अर्ज दाखल केला गेला आहे. अद्याप आरोपींवर आरोप निश्चित झालेले नाहीत, मात्र तपास यंत्रणेकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. पुढील सुनावणी – 24 एप्रिलया खटल्यातील पुढील महत्त्वाची तारीख म्हणजे 24 एप्रिल 2025. या दिवशी न्यायालयात तपास यंत्रणा त्यांचे म्हणणे मांडणार आहेत आणि त्यानंतर न्यायालय वाल्मिक कराडच्या अर्जावर निर्णय देऊ शकते. त्यामुळे या तारखेवर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रकरणातील इतर आरोपीवाल्मिक कराडसोबतच खालील व्यक्तींवर आरोप आहेत: महेश केदार सुदर्शन घुले ,प्रतीक घुले, जयराम चाटे ,सुधीर सांगळे ,कृष्णा आंधळे (फरार) यांच्यावर कट रचून हत्या केल्याचा आरोप आहे. पोलीस तपासात अनेक गुप्त साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले असून, त्यातील काहींनी व्हिडीओ आणि ऑडिओ स्वरूपातील पुरावे प्रदान केले आहेत. सामाजिक आणि राजकीय परिणामसंतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर बीड जिल्ह्यात आणि परिसरात तणावाचं वातावरण होतं. अनेक ठिकाणी बंद आणि निषेध मोरचेही निघाले. या प्रकरणाने स्थानिक राजकारणात मोठा बदल घडवून आणला आणि अनेक नवीन राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली. Santosh Deshmukh Case आता एका निर्णायक टप्प्यावर आला आहे. वाल्मिक कराडचा अर्ज, सरकारी पक्षाची कडक भूमिका, आणि कोर्टाचा निकाल – हे सर्व घटक मिळून पुढील दिशा ठरवणार आहेत. 24 एप्रिलची सुनावणी अत्यंत महत्त्वाची असून, त्यातून पुढील कारवाईचा मार्ग स्पष्ट होणार आहे. संपूर्ण राज्य आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील नागरिक आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. Santosh Deshmukh प्रकरणात Walmik Karad ला अडचणीत आणणाऱ्या ५ साक्षीदारांनी काय सांगितलं?

Beed Crime आजच्या बातम्या महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण? बीडच्या तुरुंगात नेमकं काय घडलं?

Santosh Deshmukh Case: बीड तुरुंगात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर हल्ला? बीड तुरुंगात कैद्यांमध्ये हाणामारी? बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येप्रकरणात अटक केलेले वाल्मिक कराड (Valmik Karad) आणि सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) यांना तुरुंगात मारहाण झाल्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हे दोघे मुख्य आरोपी आहेत आणि सध्या बीडच्या मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र, नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार जेलमधील इतर कैद्यांनी कराड आणि घुलेवर हल्ला केला आणि तुरुंगात मोठा वाद (Beed Jail Fight) झाला. मारहाण करणारे कोण होते? बीड तुरुंगात मकोका (MCOCA) अंतर्गत अटक असलेल्या इतर आरोपींनी हा हल्ला केला असावा, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. अक्षय आठवले (Akshay Athawale) आणि परळीतील महादेव गीते (Mahadev Gite) हे दोघे या हाणामारीत सामील असल्याचे बोलले जात आहे. ✔ घटनेचा संपूर्ण तपशील:1️⃣ सर्व आरोपींमध्ये आधी वाद झाला.2️⃣ वादाची तीव्रता वाढत गेली आणि हाणामारीत (Jail Riot in Maharashtra) बदलली.3️⃣ वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना लक्ष्य केले गेले.4️⃣ तुरुंग प्रशासनाने हा प्रकार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तुरुंग प्रशासनाने दिली का प्रतिक्रिया? बीड तुरुंग प्रशासन (Beed Jail Administration) यावर अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र, या प्रकाराची चौकशी सुरू आहे आणि सुरक्षा व्यवस्थेत बदल होण्याची शक्यता आहे. ✔ आता पुढे काय होणार? वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले कोण आहेत? ✔ वाल्मिक कराड (Valmik Karad) आणि सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी आहेत. ✔ या हत्येचा कट रचण्यात कराड आणि घुलेचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते, त्यामुळे त्यांच

आजच्या बातम्या महाराष्ट्र

Karuna Sharma खोक्याला कसं ओळखता? सांगितली ‘ती’ घटना

हे प्रकरण राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. करुणा शर्मा यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या घरावरही बुलडोजर चालवण्याची मागणी केली आहे, जी सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. याशिवाय, बीडच्या परळी न्यायालयात आज धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुनावणी होणार आहे. करुणा शर्मा यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. गहिनीनाथ गडावर घडलेला प्रसंग करुणा शर्मा यांनी सांगितले की, जेव्हा त्या गहिनीनाथ गडावर दर्शनाला जात होत्या, तेव्हा काही लोकांनी त्यांना अडवलं होतं. त्यावेळी खोक्या भोसले तिथे उपस्थित होते आणि त्यांनी त्यांना मदतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्या स्वतः कोणताही वाद नको म्हणून पुढे गेल्या नाहीत. याच घटनेचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. परंतु, करुणा शर्मा यांनी स्पष्ट केलं की, “माझे CDR, लोकेशन तपासले तरी पोलिसांना काहीच आढळणार नाही.” सध्याच्या घडामोडी पुढील घटनाक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.