Govind Barge Murder Case
Beed Updates महाराष्ट्र

Govind Barge Murder Case: ‘पिंजरा’ कुणामुळे तयार झाला?

Govind Barge मृत्यू प्रकरण : ‘पिंजरा’ कसा तयार झाला? पूजाचा खेळ तेव्हाच समजायला हवा होता! बीड जिल्हा, गेवराई तालुका, लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर-बार्शी मार्गावरील एका गावात, काळ्या रंगाच्या कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोक्यात गोळी लागलेली होती. या घटनेला सुरुवातीला आत्महत्या मानलं जात होतं, पण तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसं हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर पोहोचलं. Govind Barge आणि पूजाची ‘कथा’ गोविंद बर्गे हे विवाहित असूनही त्यांचे संबंध पूजा गायकवाड नामक महिलेसोबत होते, असा तपासात उघड झाला आहे. पूजासोबतच्या या संबंधांमध्ये बऱ्याच वादावादी घडत होती, आणि गोविंदवर मानसिक तणाव वाढत होता. तपासादरम्यान फोन कॉल डिटेल्स आणि चॅट्स तपासण्यात आले, ज्यातून असे समजले की गोविंदने पूजाला आत्महत्येची धमकी दिली होती. पण पूजाने ही धमकी गांभीर्याने घेतली नाही. याच ठिकाणी, गोविंदरावांचा ‘पिंजरा’ तयार झाला, असं त्यांचे नातेवाईक म्हणतात. पोलिसांचा तपास आणि पूजाची अटक पोलिसांनी या प्रकरणात पूजा गायकवाडला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तिची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली असून तपास सुरु आहे. पोलिसांनी उघड केलं की पूजाच्या मोबाईलमधून काही अशा मेसेजेस सापडले, जे मानसिक त्रास देणारे होते. त्यात प्रॉपर्टी तिच्या नावावर करण्यासाठी दबाव, मानसिक छळ, आणि नकारात्मक भावनिक दडपण याचा समावेश होता. Govind Barge ची चूक कुठे झाली? गोविंद बर्गे हे एक प्रतिष्ठित पदाधिकारी होते. पण वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांमध्ये त्यांनी गंभीर चुका केल्या, असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे. हे सगळं एकत्रितपणे त्यांना मानसिक दृष्टिकोनातून कमजोर करत होतं, ज्याचा शेवट भयानक ठरला. आत्महत्या की घातपात? गोविंद बर्गेंचा मृतदेह पूजाच्या घराजवळच एका कारमध्ये सापडला. त्यांनी स्वतःवर गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज होता, पण कुटुंबीय आणि नातेवाईक यांना घातपाताचा संशय आहे. “गोविंद कधीही आत्महत्या करणारा माणूस नव्हता,” असं त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी एफएसएल रिपोर्ट, फिंगरप्रिंट तपासणी, आणि सीसीटीव्ही फुटेज आदी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ‘पिंजरा’ सिनेमाची आठवण या प्रकरणामुळे अनेकांना जुना मराठी चित्रपट ‘पिंजरा’ आठवला. समाजासाठी आदर्श मानला जाणारा एक व्यक्ती, एका स्त्रीच्या मोहात फसतो आणि शेवटी त्याचा विनाश होतो — Govind Barge चं आयुष्य तसंच काहीसं वळलं. जनतेत संताप आणि चर्चेला उधाण या प्रकरणावरून सोशल मीडियावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या गेवराईच्या माजी उपसरपंचाच्या आत्महत्येचे संपूर्ण प्रकरण…