भारतीय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज (Ch. Shivaji Maharaj) हे पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. पण त्याच महाराष्ट्रात, जिथे त्यांचा वारसा अभिमानाने जपला जातो, तिथेच त्यांच्या मंदिरासाठी सरकारकडून तुटपुंजा निधी दिला जातो. उलट, छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) थडग्याच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात असल्याने वाद निर्माण झाला आहे. ⏳ औरंगजेबाच्या थडग्यासाठी लाखोंचा निधी, शिवरायांच्या मंदिरासाठी मात्र ₹250? 👉 केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व खात्याने (ASI) औरंगजेबाच्या थडग्यासाठी 2021-22 मध्ये ₹2,55,160 तर 2022-23 मध्ये ₹2,00,626 इतका निधी खर्च केला. गेल्या 10 वर्षांत 2022 मध्ये सर्वाधिक निधी दिला गेला. 👉 विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर (Sindhudurg Fort) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ ₹250 इतकाच निधी मंजूर करण्यात आला. 💥 हिंदू जनजागृती समितीचा संताप – ‘औरंगजेबाच्या थडग्याचा निधी तात्काळ थांबवा!’ 👉 हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी सरकारवर जोरदार टीका करत औरंगजेबाच्या कबरीवरील सरकारी खर्च तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस निधी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. 🤔 सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करणार का? सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ज्यांनी महाराष्ट्रासाठी आयुष्य वेचले, त्या शिवरायांच्या मंदिरासाठी एवढा तुटपुंजा निधी आणि औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखोंचा निधी, हे योग्य आहे का?
Trending
Tejasvi Surya Wedding: BJP MP तेजस्वी सूर्या अडकले लग्नबंधनात, पत्नी आहे प्रसिद्ध गायिका
भा.ज.पा.चे खासदार Tejasvi Surya यांचे नुकतेच लग्न झाले आहे आणि या गोष्टीने सोशल मीडियावर जोरदार चर्चांना जन्म दिला आहे. त्यांची पत्नी म्हणजेच चेन्नईतील प्रसिद्ध गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगना शिवश्री स्कंदप्रसाद. ६ मार्च २०२५ रोजी बेंगळुरूमध्ये झालेल्या या खासगी विवाह सोहळ्यात Tejasvi Surya आणि Shivashree यांनी लग्न केले आहे. Sivasri फक्त एक कला क्षेत्रातील नावे नाही, तर एक शास्त्रज्ञही आहे. तिने शास्त्र विद्यापीठातून बायोइंजिनियरिंगमध्ये पदवी घेतली आहे आणि चेन्नई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये एमए केले आहे. शिवश्रीचे यूट्यूब चॅनेल देखील आहे, ज्यावर तिचे २ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवश्रीच्या कलेचे आणि तिच्या योगदानाचे अनेक वेळा कौतुक केले आहे. या नवदाम्पत्यासाठी रिसेप्शन ९ मार्च २०२५ रोजी बेंगळुरूतील पॅलेस ग्राउंडवर आयोजित केले जाणार आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहणार असून, हे कार्यक्रम जोरदार उत्साहात पार पडण्याची शक्यता आहे. BJP MP तेजस्वी सूर्या यांना भाजपमधील ‘फायर ब्रँड’ नेता म्हणून ओळखले जाते. त्यांनी ABVP कडून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि २०१९ मध्ये बेंगळुरू दक्षिणमधून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला, त्यानंतर ते भारतातील सर्वात तरुण खासदार झाले. २०२० मध्ये त्यांना भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. त्यांच्या लग्नाच्या बातमीने सोशल मीडियावर अनेक शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
Shoaib Malik शोएब मलिकपासून घटस्फोटानंतर Sania Mirza ला पाकिस्तानातून काय मिळालं?
Sania Mirza फक्त तिच्या टेनिस खेळामुळेच नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया अधिक चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर देखील सानिया आणि तिच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. Shoaib Malik,पासून घटस्फोट घेतल्यानंतर सानियाने दुबईमध्ये एक नवीन आयुष्य सुरू केलं आहे. सानिया जगातील सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी एक आहे, आणि तिची संपत्ती सुमारे 210 कोटी आहे. सानिया शोएबची दुसरी पत्नी आहे, पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएबने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिला 15 कोटी रुपये पोटगी दिले होते. शोएबचं पहिलं लग्न देखील फार काळ टिकलेलं नाही. सानिया मिर्झाला घटस्फोटानंतर काय मिळालं? तर आता सानिया मिर्झा घटस्फोटानंतर पाकिस्तानातून काहीही मिळालं का? मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया मिर्झाला घटस्फोटानंतर काहीही मिळालं नाही. त्यामागे कारण आहे खुला तलाक. सानियाने शोएबपासून वेगळं होण्यासाठी खुला तलाक घेतला आहे. खुला तलाक म्हणजे, पत्नी आपल्या पतीपासून घटस्फोट मागू शकते. घटस्फोटानंतर सानिया आपल्या मुलासोबत आनंदी आणि शांत जीवन जगत आहे. तिच्या जीवनात अनेक अडचणी आले तरी ती अजूनही आपल्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक जीवनात मजबूत आहे.
Happy Women’s Day 2025: स्त्रीशक्तीचा उत्सव, तुमच्या आयुष्यातील महिलांना द्या खास शुभेच्छा!
8 March हा दिवस संपूर्ण जगभरात Happy Women’s Day 2025 स्त्रीशक्तीचा उत्सव, तुमच्या आयुष्यातील महिलांना द्या खास शुभेच्छा! म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फक्त शुभेच्छा देण्यासाठी नसून महिलांच्या योगदानाची जाणीव ठेवण्याचा, त्यांच्या संघर्षाला सलाम करण्याचा आणि त्यांना प्रेरणा देण्याचा दिवस आहे. आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण, सहकारी किंवा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही योग्य संधी आहे. महिला दिन का साजरा केला जातो? 🔹 महिलांच्या हक्कांसाठी सुरू झालेल्या चळवळींचं प्रतीक🔹 समाजातील महिलांच्या योगदानाचा सन्मान🔹 लैंगिक समानतेचा संदेश देणारा दिवस🔹 महिला सशक्तीकरणाचा उत्सव स्त्री ही कधी माता, कधी भगिनी, कधी मुलगी तर कधी मैत्रीण बनते. प्रत्येक नात्यात ती प्रेम, त्याग आणि समर्पणाचं मूर्तिमंत रूप असते. हटके Women’s Day Wishes 2025 💖 “स्त्री म्हणजे सृजनशीलता, आत्मसन्मान आणि असीम प्रेम! तिच्या कर्तृत्वाला सलाम! महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” 🌹 💪 “तुमच्या स्वप्नांना उंच भरारी घेऊ द्या, तुमच्या जिद्दीने इतिहास घडू द्या – Happy Women’s Day!” 🚀 🌼 “तुमच्या कष्टाला आणि प्रेमळ स्वभावाला सलाम, कारण तुमच्यासारख्या महिलांमुळेच समाज समृद्ध होतो!” 🌸 👩💼 “Success ही त्या महिलांची वाट पाहत असते, ज्या कधीच हार मानत नाहीत. तुमच्या जिद्दीला मानाचा मुजरा!” 🎉 तुमच्या आयुष्यातील महिलांना खास वाटेल असे काही छोटे पण अर्थपूर्ण Gesture 💐 एक छोटीशी भेटवस्तू: तुमच्या आई, पत्नी किंवा मैत्रिणीसाठी एखादी छोटी पण खास भेट द्या.✉️ Handwritten Note: तुमच्या भावना व्यक्त करणारा एक छोटासा मेसेज खूप महत्त्वाचा ठरू शकतो.🎉 Social Media वर Tribute: तुमच्या आवडत्या महिलेला tag करून तिचं कौतुक करा.👩🏫 Teacher किंवा Mentor ला आभार व्यक्त करा: ज्या महिलांनी तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांचे आभार माना. महिलाशक्ती – प्रेरणादायी स्त्रिया भारतात आणि जगभरात अनेक महिलांनी आपल्या कार्याने इतिहास घडवला आहे. कल्पना चावला, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, किरण बेदी, मेरी कोम, पी. व्ही. सिंधू यांसारख्या स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आदर्श घालून दिला आहे. महिला दिनाचा खरा अर्थ – प्रत्येक दिवशी महिलांचा सन्मान! महिला दिन फक्त 8 मार्चपुरता मर्यादित नसावा. महिलांच्या हक्कांचा, समानतेचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान प्रत्येक दिवशी व्हायला हवा. 👉 तुमच्या आयुष्यातील महिलांना आजच एक खास मेसेज पाठवा आणि त्यांचा सन्मान करा!
Dhananjay Munde Resignation: पंकजा मुंडेंची तीव्र प्रतिक्रिया – ‘हा निर्णय खूप उशिरा घेतला!’
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री Dhananjay Munde यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हा निर्णय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर घेतला गेला. धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला, आणि त्यानंतर त्यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी या प्रकरणावर स्पष्ट भूमिका घेतली असून, हा राजीनामा आधीच घ्यायला हवा होता, असे ठामपणे सांगितले. पंकजा मुंडेंची ५ महत्त्वाची विधानं१. जबाबदारी आणि निष्पक्षपाती भूमिका:“मी आमदार म्हणून शपथ घेतली आहे आणि कोणत्याही व्यक्तीविषयी आकस किंवा द्वेष न बाळगता, संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांचा विचार करणे हे माझे कर्तव्य आहे.” २. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची व्यथा:“संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा मी तीव्र निषेध करते आणि त्यांच्या कुटुंबाची मनःपूर्वक क्षमा मागते. ज्या कोणत्या व्यक्ती या हत्येच्या कटात सहभागी असतील, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.” ३. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल परखड मत:“धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता. खरंतर, त्यांनी ही जबाबदारी स्वीकारायचीच नव्हती. त्यामुळे आज ज्या परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे, ती टाळता आली असती.” ४. उशिरा घेतलेला निर्णय:“जर त्यांनी पूर्वीच राजीनामा दिला असता, तर त्यांना गरिमामय मार्ग मिळाला असता. या सर्व वेदनांपासून स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवू शकले असते.” ५. कुटुंबातील नातेसंबंध आणि भावनिक बाजू:“मी धनंजय मुंडेंची लहान बहीण आहे. जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षांत असलो, तरी कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागणे दुःखद आहे. मात्र, जेव्हा आपण लोकप्रतिनिधी असतो, तेव्हा संपूर्ण राज्याचा विचार केला पाहिजे.” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय?➡️ राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की, धनंजय मुंडेंना या प्रकरणातून मोकळीक मिळेल का?➡️ सूत्रांच्या माहितीनुसार, CID च्या आरोपपत्रात त्यांच्या विरोधात थेट पुरावे नाहीत.➡️ त्यामुळे त्यांना सहआरोपी केले जाण्याची शक्यता कमी आहे.➡️ भाजपकडूनही या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवले जात आहे.
Beed, Santosh Deshmukh-अत्याचाराचे धक्कादायक फोटो समोर! 10 Photos 3 Videos
Santosh Deshmukh Murder Case: The Dark Side of Crime in Beed Bheed मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या हत्येची क्रूरता पाहून कोणीही सुन्न होईल. हत्येचा घटनाक्रम दर्शवणारे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, जे आरोपींच्या अमानुषतेचे चित्र स्पष्ट करतात. क्रूर हत्येची अमानुष कहाणी पहिल्या फोटोत दिसते की जयराम चाटे संतोष देशमुख यांची पँट जबरदस्तीने काढतो, तर दुसऱ्या फोटोत महेश केदार निर्घृणपणे हसत सेल्फी घेत आहे. तिसऱ्या फोटोत प्रतिक घुले, देशमुख अर्धमेल्या अवस्थेत असताना, त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका करत आहे. यासोबतच, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी निर्दयपणे संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. पाईप, वायर आणि लाथा-बुक्क्यांनी झालेली मारहाण एवढी निर्दय होती की त्यांच्या शरीरातील रक्त तळपायापर्यंत वाहू लागले. Murderers Who Crossed the Limits of Cruelty या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: बीडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती Santosh Deshmukh यांच्या हत्येचे 8 फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर Beed शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. Beed Police’s Appeal to the Public या फोटो आणि व्हिडिओंमुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. Beed चे SP नवनीत कॉवत यांनी जनतेला शांत राहण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. “हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,” असे त्यांनी सांगितले. Photos ही घटना महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करते. हत्येच्या या क्रौर्याला कधीच माफी नाही. न्याय मिळावा, अशीच अपेक्षा
Prajakta Mali Bold Look: छोटा ब्लाऊज आणि अनकम्फर्टेबल साडी!
मराठमोळी अभिनेत्री Prajakta Mali ही आपल्या सोज्वळ लूकसाठी ओळखली जाते. मात्र, एका इव्हेंटमध्ये Bold Look कॅरी करताना तिला काहीसं अनकम्फर्टेबल वाटलं. नुकत्याच दिलेल्या Interview मध्ये तिने हा अनुभव सांगितला. रेड कार्पेटवर Bold Look मध्ये अस्वस्थ? एका TV Channel ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने सांगितले की, एका Event साठी तिला स्टायलिस्टने खास Saree आणि ब्लाऊज दिला होता. पण तो ब्लाऊज खूप छोटा असल्याने ती अस्वस्थ झाली. “स्टायलिस्टने मला एक सुंदर पण Bold Saree दिली होती. पण त्यावरचा ब्लाऊज खूप छोटा होता. मी मोठा करायला सांगितलं, पण आधीच मोजमाप दिलं होतं, असं तिने सांगितलं. मी तो ब्लाऊज घातल्यावर लक्षात आलं की मी तो कॅरी करू शकणार नाही,” असं प्राजक्ता म्हणाली. ब्लाऊज बदलण्याचा प्रयत्न फसला! प्राजक्ताने स्वतः ब्लाऊज थोडा मोठा करण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. त्यामुळे तिला रेड कार्पेटवर तसाच लूक कॅरी करावा लागला. “माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता, त्यामुळे मी आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर गेले. मी तिथे बोल्ड दिसले असणार, पण मी चेहऱ्यावर काहीही न दाखवता कॉन्फिडन्स ठेवला,” असं तिने स्पष्ट केलं.
Lord Ganesha ते Swami Samarth..Shegaon मध्ये प्रकट झालेले Shri Gajanan Maharaj कोणाचा अवतार होते?
आज शेगावच्या Shri Gajanan Maharajप्रकटदिन आहे. २३ फेब्रुवारी १८७८ ला अचानक श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर गजानन महाराज प्रकट झाले होते. एकेदिवशी अचानक शेगावी प्रकट झालेले गजानन महाराज कुठून आले असा प्रश्न आजही अनेकांना पडतो. गजाननन महाराज योनीवाचून प्रकट झाले होते त्यामुळे गजानन महाराज कोणाचा तरी अवतार आहेत असे मानले जाते. पण गजानन महाराज कोणाचा अवतार होते? असा प्रश्न केल्यावर काहीजण ते गणपतीचे अवतार होते असं सांगतात, काहीजण ते स्वामी समर्थांचे अवतार होते असं तर काहीजण ते दत्त प्रभूंचे अवतार होते असं सांगतात. गजानन महाराज कोणाचा अवतार होते? बुलढाण्यातील एक महत्वपूर्ण श्रद्धास्थान म्हणजे शेगाव, जिथे निवास करत शेगाव राणा गजाजन महाराज. “गण गण गणात बोते,” हा त्यांचा आवडता मंत्र. ते सदा या मंत्राचा जप करित. त्यामुळेच त्यांना ‘गिणगिणेबुवा’ ‘गजानन महाराज’ अशी नावे पडली, असं काहीजण सांगतात तर वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने ‘गजानन बाबा’ म्हणतात. सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना शेगाव परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या गजानन बाबांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. आणि लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले महान संत होते. मानवांचा उद्धार करणाऱ्या गजानन महाराजांचे जीवन हे एक मोठे गूढच म्हणावे लागेल. आज त्यांचा प्रकट दिन आहे, पण आजही ते कुठून प्रकट झाले? शेगाव मध्ये प्रकट होण्यापूर्वी ते कुठे होते? अश्या अनेक प्रश्नांची आजही कोणतीही ठोस उत्तरे उपलब्ध नाहीत. पण त्यांनी भक्तांचा कसा उद्धार केला याबद्दल मोठी माहिती उपलब्ध आहे. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच विशिष्ट अशी एक शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जातात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जातात, असा अनुभव गजानन बाबांचे भक्त सांगायचे. सर्व भक्तांवर कृपेचे छत्र धरून ते भक्तांना चिंतामुक्त करतात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. तर परमोच्च स्थितीला पोहोचलेले गजानन महाराज नेमका कोणाचा अवतार होते ते आता पाहुयात. गोष्ट आहे स्वामी समर्थांच्या काळातील. तेव्हा स्वामी समर्थांच्या भेटीस आलेल्या एका १८-१९ वर्षाच्या मुलास त्यांनी गणपती असे म्हटले आणि नंतर त्याला कपिलधारेला तपश्चर्या करण्यास पाठवले होते. आणि स्वामी समर्थांच्या भेटीस आलेला हाच मुलगा म्हणजे गजानन महाराज असल्याचे काहीजण सांगतात त्यामुळे शेगावचे गजानन महाराज हे गणपतीचा अवतार असल्याचं अनेक जण मानतात , आणि म्हणूनच त्यांच नाव गजानन आहे जे गणपतीचं नाव आहे असा संदर्भ दिला जातो. पण जर ते गजानन महाराज होते असे गृहीत धरले तर १२ वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांचे वय ३० व्हायला हवे होते मात्र गजानन महाराज प्रथम प्रगट झाले तेंव्हा त्यांचे वय १८ वर्षेच होते त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी गणपती म्हटलेला मुलगा निश्चितपणे श्री गजानन महाराज नव्हते असं म्हणता येत. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते. दोघेही परमहंस संन्यासी होते, दोघेही अजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत ज्याचा समोरच्यांना अर्थ कळत नसे. त्यामुळे स्वामी समर्थ व गजानन महराज यांच्या मध्ये आढळणाऱ्या या साम्यामुळे अनेक जण गजानन महाराज अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे अवतार असल्याचं सांगतात. मात्र साधारणपणे गजानन महाराज स्वामी समर्थांच्या समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले होते त्यामुळे गजानन महाराज अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे अवतार असल्याचे देखील ठोसपणे सांगता येत नाही. दरम्यान, स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे गुरु असावेत असं काहीजन सांगतात. श्री स्वामी समर्थांच्या शिष्यांनी स्वामींचे मठ स्थापून त्यांचा संबंधित प्रांतात प्रचार केला, स्वत: स्वामी मात्र सर्वत्र फिरत असताना देखील कधीच स्वत:चा प्रचार करीत नव्हते, त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज देखील सदैव सर्वत्र फिरत असत मात्र त्यांनी स्वत:चा किंवा स्वामी समर्थांचा प्रचार कधीच केला नाही. यावरून स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे गुरु नसावेत, उलट गजानन महाराज हे नाथ संप्रदायातील दत्त गुरूंचे अवतार असावेत असा अंदाज लावला जातो. स्वामी समर्थ व गजानन महाराज या दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते. म्हणूनच जिथे स्वामी समर्थांना दत्तात्रय अर्थात आपल्या श्री गुरुदेव दत्त यांचा अवतार मानलं जात त्याच प्रमाणे गजानन महाराज देखील श्री गुरुदेव दत्त यांचेच अवतार आहेत असं सांगितलं जात. तर असं सांगण्यामागे असलेल्या दृढ कारणामुळे अनेक जण गजानन महाराजांना दत्त गुरुंचेच अवतार मानतात.
Apple चा नवा धमाका! iPhone 16e बाजारात, काय आहेत खासियत आणि किंमत?
Apple चे नवीन iPhone 16e (आयफोन 16e) लॉन्च करण्यात आला आये. या फोनचा केही दिवसापासून चार्चा चालू होता. या नव्या आयफोनमध्ये Apple Intelligence सुविधां आहेत. सर्वत्र खास म्हजे महत्ववीर तन्या जाणून घ्या या फोनची स्पेशाल तेरी. iPhone 16e चे खास फीचर्स iPhone 16e ची किमत Apple च्या अधिकृत संकेतस्थळावर iPhone 16e विषय माहिती केली गेली आहे. या फोनची किमत 59900 रुपये आहे. जर तुम्हाला इमीआई योजने गेणी असेल, तर 2496 रुपये/महिन्याच्या गे प्रतिमहिन्या योजने गेणी होऊ शकतो. Apple चे नवीन iPhone 16e तेजा तैरा चार्चा बरच सागली होता. याशी iPhone 16 मध्ये गेळ्या Apple Intelligence सुविधाचा आयोज़क** करणात आहे. जर तुम्हाला नवीन मॉडल खरीदी करायचा आसेल, तर या आयफोनचा विचार करा.