HMPV Virus India: करोना विषाणूचा सामना यशस्वीरित्या केल्यानंतर जग पुन्हा एकदा एका नव्या श्वसनविषयक विषाणूचा सामना करत आहे. चीनमध्ये HMPV (ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस) नावाच्या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ लागला आहे, ज्यामुळे जगभरातील शासनकर्त्यांमध्ये चिंता वाढली आहे. HMPV विषाणू म्हणजे काय? HMPV (ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस) हा एक श्वसनविषयक विषाणू आहे, जो मुख्यतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आणि अशक्त प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना प्रभावित करतो. सध्या चीनमध्ये या विषाणूमुळे अनेक नागरिक रुग्णालयात दाखल झाले आहेत. HMPV विषाणूची लक्षणं: तज्ज्ञांच्या मते, HMPV विषाणूमुळे पुढील लक्षणं जाणवू शकतात: HMPV विषाणूला घाबरू नका. श्वसनसंस्थेच्या या आजारात सर्दी,खोकला,ताप येतो, तो शिंका- खोकल्यातूनच पसरतो.पण कोरोनाइतका तो घातक नाही. २००१मध्येच त्याला विलग करून त्याचा अभ्यास झालेला आहे. चीन,जपान,अमेरिका,कॅनडामध्ये याचे रुग्ण पूर्वीपासून आढळत आहेत.भारतात याने बाधित रुग्ण आढळले नाहीत. pic.twitter.com/14WZ73rKyN — Avinash Bhondwe (@AvinashBhondwe) January 6, 2025 लागण झाल्यास उपाय: जर तुम्हाला HMPV विषाणूची लक्षणं जाणवत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपचारांसाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात: HMPV विषाणूपासून संरक्षण कसं करावं? महाराष्ट्रातील परिस्थिती: सध्या महाराष्ट्रात HMPV विषाणूचा एकही रुग्ण आढळला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तरीही, योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
आजच्या बातम्या
पुणे आणि पुणेकरांबद्दल विधान व्हायरल : Devendra Fadnavis
नागपूरमध्ये एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पुणेकरांबाबत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पुणेकरांच्या खास स्वभावविशेषांवर त्यांनी विनोदी अंदाजात भाष्य केल्यामुळे सोशल मीडियावर यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नागपूरमध्ये काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? नागपूरमध्ये आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात नागपूर मेट्रोच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध मेट्रो प्रकल्पांबद्दलचा आढावा घेतला आणि पुणेकरांच्या स्वभावावर हलकंफुलकं भाष्य केलं. पुणे आणि पुणेकरांबद्दल विधान फडणवीस म्हणाले, “पुणे हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे. मात्र, पुणेकर हे नेहमीच थोडं वेगळं असतं. ते एखाद्या गोष्टीचं कौतुक करताना पण एक विनोदी टीप्पणी देतात. त्यामुळे पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाबद्दल बोलणंही आव्हानात्मक असतं.” सोशल मीडियावर चर्चेचा विषय त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर पुणेकरांनी विनोदी आणि गंमतीशीर प्रतिक्रियांची रांग लावली आहे. काहींनी त्यांच्या विधानाचं समर्थन केलं, तर काहींनी विनोदाने घेतलं. महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांची वाटचाल कार्यक्रमात फडणवीसांनी नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो, आणि इतर प्रकल्पांबद्दलही चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्प हे देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहेत. नागपूर मेट्रो हा वेगवान आणि लोकाभिमुख प्रकल्प आहे.“
Manoj Jarange Patil : ‘यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही…’ प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil : ‘यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही…’ प्रतिक्रिया लेखक: Maharashtra katta | तारीख: 04 जानेवारी, 2025 मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्याची माहिती आहे. हे दोन मुख्य आरोपी आहेत. या अटकेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आता एक काम सरकारकडून होणं गरजेचं आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सरकारने यात अजिबात हयगय करु नये. कारण यामध्ये मोठं रॅकेट आहे” असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. “पुण्यातून सगळ्यांना पकडलं जातय याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्याच प्रचंड राजकीय पाठबळ आहे. यांना कोण संभाळतय, त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. “देशमुख बांधवाची क्रूर पद्धतीने हत्या झाली. आरोपीला संभाळण्यात यांना मोठेपणा वाटतो. हे कोण आहेत? यांना आरोपीला भाकरी द्यावीशी वाटते. आरोपीला संभाळतात. त्यांना ऐशोआराम देतात. आरोपीने कोणाच्या तरी लेकाचा, लेकीच्या बापाचा खून केलाय. तुम्ही त्यांना संभाळताय. सरकारने यांना पाठिशी घालू नये. हे रॅकेटच आहे” — मनोज जरांगे पाटील Share this post: WhatsApp Instagram Facebook Twitter
Chhgan Bhujbal NCP सोडून जाणार?
आता छगन भुजबळांनी केलेल्या या सूचक वक्तव्यानंतर त्यांनीच केलेल्या अजून एका वक्तव्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी सोडून इतर कोणत्या नाही तर भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेतच्या बैठकीनंतर “आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते” असं म्हटलं आहे त्यांच्या याच वक्तव्यातून छगन भुजबळ महायुतीवर नाही तर राष्ट्रवादी पक्षावर त्यातही खास करून अजित पवार व सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय. त्यामुळे राष्ट्रवादीवर नाराज असलेले छगन भुजबळ हे आता महायुतीतील भाजपामध्ये जाऊ शकतात अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशासाठी भाजपा देखील आग्रही राहू शकते. ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे दोन प्रमुख नेते होते. एक म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि दुसरे म्हणजे छगन भुजबळ. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्याकडचा ओबीसी नेता गमावला, त्यामुळे भाजपला त्यांच्या पक्षात एका ओबीसी नेत्याची गरज आहे. खास करून तेव्हा, जेव्हा राहून गांधी सातत्याने संसदेत जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. आणि भाजपाची हि गरज छगन भुजबळ यांच्या रूपाने पूर्ण होऊ शकते, त्यामुळे भाजप छगन भुजबळ यांच्या पक्षप्रवेशा संदर्भात आग्रही राहू शकते.
१० जानेवारी २०२५: सुवर्ण नियंत्रण कायदा दिनानिमित्त सोनार समाजासाठी विशेष चर्चासत्रांचे आयोजन
जय मैड – बातमीदार १० जानेवारी २०२५ रोजी सुवर्ण नियंत्रण कायदा दिना निमित्तठिकठिकाणी चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावेसकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे आवाहन येत्या १० जानेवारी २०२५* रोजी महाराष्ट्रात तसेच भारतात जेथे जेथे सर्व शाखीय सोनार समाजाचा अधिवास आहे, तेथे तेथे स्थानिक सर्व शाखीय सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी सुवर्ण नियंत्रण कायदा दिनानिमित्त सुवर्ण नियंत्रण कायदा आणि सर्व शाखीय सोनार समाजावर झालेले व्यावसायिक परिणाम या विषयावर चर्चासत्र आयोजित करावे, असे आवाहन सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक श्री मिलिंद कुमार सोनार यांनी केले आहे.चर्चासत्रात सुवर्ण नियंत्रण कायदा अस्तित्वात आल्यानंतर सोनार व्यावसायिकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले, सोनार सराफ आणि सुवर्ण कारागिरी करणाऱ्या सोनार समाज घटकांवर झालेले परिणाम यावर भर देण्यात यावा, असे आवाहन देखील मिलिंद कुमार सोनार यांनी केले आहे.
पालिकेच्या जागेचा फलक पण नेमकी जागा कुठे ? कोथरूड-
कोथरूडमधील अमेनिटी स्पेस: विकासाच्या प्रतिक्षेत की अतिक्रमणाच्या विळख्यात? कोथरूडमधील भुसारी कॉलनी येथील इशना सोसायटी परिसरात असलेल्या सर्व्हे नं. ७७/२ वरील १०७१.७७ चौ. मीटर अमेनिटी स्पेसवर अतिक्रमण झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी आहे. महापालिकेच्या ताब्यात असूनही सदर जागेचा योग्य विकास न झाल्याने अतिक्रमणाला चालना मिळाली आहे. पालिकेचा फलक पण जागा अदृश्य पालिकेने जागेवर ताबा असल्याचे दर्शवणारा फलक उभारला आहे. मात्र, जागेभोवती सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्या जागेवर वाहने पार्किंग केली जातात. यामुळे नागरिकांना जागेची नेमकी हद्द समजत नाही. अतिक्रमणाचे वाढते प्रमाण सदर जागेच्या मागील बाजूस उभारलेल्या पत्र्यांविषयी स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या पत्र्यांमुळे जागेवर अनधिकृत बांधकाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागा पडीक असल्याने ती हळूहळू व्यावसायिक ताब्यात जाण्याची भीती आहे. नागरिकांची मागणी आणि प्रशासनाचे पाऊल नागरिकांनी जागेचा विकास करून लोकाभिमुख प्रकल्प उभारण्याची मागणी केली आहे. या संदर्भात महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपअभियंता राजेश थोरात यांनी जागेची पाहणी केल्याचे सांगितले. संबंधित अतिक्रमणकर्त्यांना लवकरच नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्याचा सवाल पालिकेच्या दुर्लक्षामुळे मोक्याची जागा हातातून जाण्याची भीती स्थानिकांमध्ये आहे. जर प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर ही महत्त्वाची जागा कायमची गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तुम्हाला काय वाटते? अशा आरक्षित भूखंडांचा विकास त्वरित व्हावा का? कंमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा!
Ladakh येथील Chhatrapati Shivaji Maharaj Statue वर कोणी घेतला आक्षेप?
पँगॉन्ग तलावावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा: गौरव की वादाचा मुद्दा? २६ डिसेंबर रोजी लडाखमधील भारत-चीन सीमेवर असलेल्या पँगॉन्ग तलाव परिसरात भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. या कृत्याचे अनेकांनी कौतुक केले, आणि सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले. मात्र, या पुतळ्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लष्कराची बदललेली रणनीती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लष्कराच्या नव्या रणनीतीचे प्रतीक मानला जातो. लडाखमध्ये लष्कर जलदगतीने रस्ते, पूल, बंकर यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहे, जेणेकरून कोणत्याही संकटाला सक्षमपणे सामोरे जाता येईल. पुतळ्यामुळे भारताचे सांस्कृतिक वैभव तर दिसून येतेच, पण त्याचबरोबर सामरिक दृष्टिकोनातूनही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. पर्यावरणीय चिंता आणि स्थानिकांचा विरोध तथापि, या पुतळ्याबद्दल काही स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चुशुलचे काउन्सिलर कोंचोक स्टॅनजिन यांनी स्थानिकांशी सल्लामसलत न करता पुतळा उभारल्याचा आरोप केला आहे. पर्यावरणीय संवेदनशीलता आणि वन्यजीवांचे रक्षण दुर्लक्षित केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या निर्णयावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लष्कराचे स्पष्टीकरण लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने या पुतळ्याला शौर्य, दूरदृष्टी आणि न्यायाचे प्रतीक मानले आहे. पुतळ्याचा उद्देश स्पष्ट करत त्यांनी यावर सविस्तर निवेदन दिले. तुमचे यावर काय मत आहे? कंमेंट करून नक्की कळवा.
Beed प्रकरणाच्या आधीपासून Suresh Dhas विरुद्ध Pankaja व Dhananjay Munde असा संघर्ष कसा चालू झाला?
सध्या महाराष्ट्रात लोक सर्वात जास्त जर कोणत्या बातमीची वाट पाहत असतील तर ती म्हणजे वाल्मिक कराड याच्या अटकेची आणि असच काहीस सध्या झालय. अखेर मस्साजोग प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडला अटक केली आहे. दरम्यान वाल्मिक कराड याच्या अटके मुळे आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय होणार? धनंजय मुंडेंवर या अटकेचा काय परिणाम होणार ते जाणून घेऊयात वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आल्याने आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळणार असल्याचं बोललं जात असून, या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड कडे एक मुख्य आरोपी आणि सूत्रधार म्हणून बघितलं जात होत, त्यामुळे आता पोलीस चौकशीमध्ये वाल्मिक कराड कोणते नवे खुलासे करणार, वाल्मिक कराडच्या स्टेटमेंट मध्ये कोणती नवी नावे समोर येणार का या कडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहील आहे. दरम्यान वाल्मिक कराड आता पोलिसांच्या ताब्यात असल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेग मिळून लवकरच या हत्या प्रकरणातील खरा आरोपी कोण आहे? संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली? त्यांच्या हत्ये मागील नेमकं काय कारण होत? हे समोर येऊन संतोष देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडचा अँगल समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे मानले जात असल्याने आरोपी वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची साथ आहे, धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्याने वाल्मिक कराड मोकाट आहे, त्याला अजूनही अटक झालेली नाही असे आरोप देखील धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आले होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय अस्तित्वाव देखील धोक्यात आलं होतं, म्हणूनच याचा धनंजय मुंडेंच्या राजकारणावर काय परिणाम होणार तेही पाहुयात. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड च नाव जोडलं गेल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, ज्यात महायुतीमधील नेत्यांचा देखील समावेश होता. तसेच “आकाचा आका” म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड वर वरदहस्त असल्याचं देखील सूचित केलं होतं. तर माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन आरोपींना शिक्षा होई पर्यंत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता या सगळ्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली जाणारी मागणी बंद होईल आणि धनंजय मुंडे यांना त्यांचं मंत्रिपद कायम ठेवता येईल असं बोललं जातंय. दरम्यान या प्रकरणावरून मराठा विरुद्ध ओबिसि वाद पुन्हा एकदा उफाळला होता. आणि या वादाच्या केंद्रस्थानी धनंजय मुंडे होते. मात्र आता आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने बीड मध्ये चालू झालेला हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष कमी होईल व ओबिसि नेते असणाऱ्या धनंजय मुंडे यांना याची कमी झळ बसण्याची शक्यता आहे. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या प्रमाणे धनंजय मुंडे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी घेरलं होत, त्याचप्रमाणे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा लावून धरत महायुतीसरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील विरोधकांकडून घणाघाती टीका करण्यात येत होती. तर महायुती सरकारच्या कार्य क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. पण आता अखेर वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने महायुतीसरकार वर होणारी हि चिखलफेक कमी होणार असल्याचं दिसतंय. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच वाल्मिक कराड च्या अटकेचा धनंजय मुंडे यांना फायदा होणार का ते कंमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला काय वाटतं, वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्याने धनंजय मुंडे यांना फायदा होणार का ते कंमेंट करून नक्की सांगा
BJP ने खरंच Manmohan Singh यांचा अपमान केला?
राजघाट नाहीतर निगमबोध घाटावर भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्य संस्कार करण्यात आल्याने अंत्य संस्कारां वेळी भाजप सरकारकडून त्यांचा अपमान करण्यात आला असे आरोप होत असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांना राजघाट का नाकारण्यात आला असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. म्हणूनच भाजप सरकारने खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला का? सरकारच्या कोणत्या कृत्यांमुळे त्यांचा अपमान झाला? आणि यावर भाजपा व काँग्रेसने नेमकी कोणती भूमीका घेतली आहे तेच जाणून घेऊयात अर्थतज्ज्ञ व २००४ ते २०१४ पर्यंत भारताचे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी २६ डिसेंबर २०२४ रोजी उशिरा रात्री दिल्लीतील एम्स येथे निधन झाले होते. २८ डिसेंबरला निगमबोध घाटावर पूर्ण सन्मानाने, शासकीय इतमामात त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अंत्यसंस्काराच्या जागेची निवड हि डॉ. मनमोहन सिंग यांचा “अपमान” आहे असं म्हटलंय. “भारतमातेचे महान सुपुत्र आणि शीख समुदायाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून सध्याच्या सरकारने त्यांचा पूर्णपणे अपमान केला आहे. ते एक दशक भारताचे पंतप्रधान होते, त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला आणि त्यांची धोरणे अजूनही देशातील गरीब आणि मागासवर्गीयांना आधार देतात, आजपर्यंत, सर्व माजी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करून, त्यांचे अंत्यसंस्कार राजघाट येथे करण्यात आले जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला अंतिम ‘दर्शन’ घेता येईल आणि कोणत्याही गैरसोयीशिवाय श्रद्धांजली वाहता येईल. डॉ. मनमोहन सिंग हे आपल्या सर्वोच्च आदराचे आणि स्मारकाचे पात्र आहेत. सरकारने देशाच्या या महान सुपुत्राचा आणि त्यांच्या अभिमानी समुदायाचा आदर करायला हवा होता,” असं राहुल गांधी या प्रकाराबाबत बोलताना म्हणाले. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान होते. त्याप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील राजघाट येथे होण व त्यासोबतच राजघाट येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभारणं अपेक्षित होत, मात्र असं काहीही झालं नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार राजघाट ऐवजी निगमबोध घाटावर करण्यात आले. तर त्यांच्या स्मारकासाठी कोणतीही जागा तातडीने उपलब्ध करून न देता, दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी योग्य जागा शोधण्यात येईल व तेथे त्यांचे स्मारक उभारले जाईल असं सरकारने म्हटले आहे. यासोबतच मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारांचे थेट प्रक्षेपण देखील कोणत्याही शासकीय वाहिनी कडून करण्यात आले नव्हते. परिणामी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांना या प्रकारची दुय्यम वागणूक देऊन सरकार ने डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला आहे असा आरोप अनेक जण करत असून, या मुद्द्यावरून अनेकांनी सरकारवर टीका देखील केली आहे. या सगळ्या आरोपांनंतर भाजपची बाजू मांडताना गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. “भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीत का झाले नाहीत? त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ शहरात करण्यास कोणी सांगितले होते. काँग्रेसने नरसिंहराव यांच्यासाठी नेमके कुठे स्मारक बांधले आहे? त्या स्मारकाचा पत्ता कृपा करून आम्हाला द्यावा. आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र तिथे जाऊ” असं म्हणत काँग्रेसच्या काळात पी व्ही नरसिंहराव यांच्यावर झालेल्या अन्यायाचा दाखला देत डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलेल्या वागणुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न गौरव भाटिया यांनी केला आहे. जवळपास एक दशक भारताचे पंतप्रधान राहिलेले, व शीख समुदायाचे एकमेव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मिळालेली एकूणच हि वागणूक अतिशय खेद जनक असून यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान झाला का? यावर तुमचे मत काय ते कंमेंट करून नक्की सांगा. भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना महाराष्ट्र कट्ट्याच्या संपूर्ण टीम कडून भावपूर्ण श्राद्धांजली.
जागा मोकळी करण्याची पालिकेने बजावली सोसायटीला नोटीस.-
कोथरूड परिसरातील उजवी भुसारी कॉलनी येथील ईशाना सोसायटीमध्ये सर्व्हे नं. ७७/२ येथे पालिकेची १०७१.७७ चौ.मी जागा असून सदर ठिकाणी अतिक्रमण केले होते. पालिकेच्या ताब्यात जागा असून तसा पालिकेने फलक देखील लावलेला आहे. परंतू जागेच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना न केल्याने येथे अतिक्रमण केले असल्याचे दिसून येते. याबाबत बातम्या.इन ने वृत्त प्रसिध्द करताच पालिकेने सोसायटीला नोटीस बजावली असून जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. जागेचे भाव वाढत असून गगनाला भिडले आहेत. कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनी येथे ईशाना सोसायटी आवारात असलेली १०७१.७७ चौ.मी म्हणजे साधारण ११ गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात आहे. मोठी जागा असून लोकाभिमुख प्रकल्प चांगलाच विकसित होऊ शकतो. परंतू सध्या येथे वाहने पार्किंग होत असून तसेच जागेला सुरक्षाभिंत नसल्याने जागा नेमकी कुठून सुरू होते आणि कुठे संपते हे समजणे कठीण आहे. खाजगी बांधकाम व्यावसायिक येथे पुनर्विकास करण्याचे काम सुरू करत असून पालिकेची जागा सोसायटीच्या जागेमध्ये समाविष्ट करत त्यांनीच हे पत्र लावले आहेत अशी चर्चा कोथरूड परिसरात रंगली आहे.सदर जागेबाबत वृत्त प्रसिद्ध होताच पालिका मालमत्ता व्यवस्थापन विभाग खडबडून जागे होत. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने ईशाना -३ सोसायटीचे चेअरमन यांना नोटीस बजावली असून स.नं ७७/२ या ठिकाणी अमिनिटी स्पेस/जागा पुणे महानगर पालिकेच्या मालकीची जागा तात्काळ मोकळी करून द्यावी असा आदेश देण्यात आला आहे. सदर जागा मोकळी केली नाही तर आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. पुणे शहराचे भाजयुमो सरचिटणीस दुष्यंत मोहोळ म्हणाले की, चांदणी चौकापासून जवळच असलेल्या उजवी भुसारी कॉलनी येथे दहा गुंठे जागा असून सदर जागा पालिकेच्या ताब्यात देखील आहे. शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता पालिकेच्या सुविधा वाढविणे आवश्यक आहे. सदर जागेवर नागरिकांच्या हितासाठी चांगला प्रकल्प किंवा वास्तू उभारता येऊ शकते. पालिकेच्या जागेला सुरक्षाभिंत असणे आवश्यक आहे, ती असली असती तर अतिक्रमण झाले नसते. पालिकेकडे सुरक्षाभिंत बांधण्यासाठी पैसे नसतील तर आम्ही लोकवर्गणी गोळा करून पालिकेकडे सुरक्षा भिंत उभारण्यासाठी निधी देऊ.