Bacchu Kadu
आजच्या बातम्या

Bacchu Kadu यांच्या आंदोलनातील १७ महत्त्वाच्या मागण्या

Spread the love

महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते Bacchu Kadu यांनी आपल्या आक्रमक आणि थेट शैलीने पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधले आहे. शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, ओबीसी आणि धनगर समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवत त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून, राज्यभरातून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळतो आहे.

Bacchu Kadu
Bacchu Kadu

आंदोलनाची पार्श्वभूमी
Bacchu Kadu नी हे आंदोलन राष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी केवळ नाही, तर त्या राज्यातल्या वंचित, दुर्बल सामाजिक घटकांच्या हक्कासाठी सुरू केलं आहे. त्यांचा आरोप असा आहे की शासन फक्त घोषणा करत आहे, पण अंमलबजावणी होत नाही. म्हणूनच त्यांनी आंदोलनाचं शस्त्र हाती घेतलं आहे.

या आंदोलनात १७ ठोस मागण्या समाविष्ट असून त्या समाजाच्या मूलभूत गरजांशी संबंधित आहेत. चला पाहूया त्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत:

Bacchu Kadu च्या आंदोलनात महात्वाच्या मागण्या
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी.

दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा ₹6000 मानधन देण्यात यावे.

आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि शेतमालाला MSP पेक्षा 20% अनुदान द्यावे.

06 एप्रिल 2023 रोजीच्या बैठकीच्या इतिबृत्तावरून शासन निर्णय त्वरित जाहीर करावा.

गोरगरीब, वंचित घटकांना सन्मानजनक घरकुल मिळावं.

ग्रामीण भागात घरकुलासाठी रु. 5 लाखाचे अनुदान लागू करावे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापून ₹10 लाख मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी.

मजुरांना MREGS मध्ये समाविष्ट करून ₹1000 मजुरी द्यावी.

संजय गांधी योजनेंतर्गत मंजूर रक्कम तात्काळ लाभार्थ्यांना मिळावी.

शेतकरी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू करावी.

100% दिव्यांगांना शासकीय नोकरीत 5% आरक्षण लागू करावे.

OBC आरक्षण 27% ठेवून नोकरभरतीत त्यांना संधी द्यावी.

शेतमाल विमा योजना थेट खात्यावर लागू करावी व शासनाने 50% हप्ता द्यावा।

शेतकऱ्यांना खत व बियाणे विनामूल्य द्यावे.

शेती वीज बील माफ करून नियमित वीजपुरवठा द्यावा.

शासकीय खरेदी केंद्रावर हमीभवत मिळालेल्या किंमती वाजणीवर शेतमाल खरेदी केली जावी.

धनगर समाजाला तत्काळ 13% आरक्षण लागू करावी.

राज्यभरातून मिळतोय पाठिंबा
या मागण्या केवळ विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित नसून, त्या विविध सामाजिक घटकांच्या मूलभूत गरजांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळेच राज्यभरातून विद्यार्थी, महिला, शेतकरी, दिव्यांग आणि राजकीय नेते या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.

नुकतेच राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी बच्चू कडूंशी फोनवर संपर्क साधत त्यांची प्रकृती जपण्याचा सल्ला दिला. नितेश कराळे मास्तरांनी हे संभाषण घडवून आणले. हे सरकारकडून काही हालचाल होण्याच्या संकेतांपैकी पहिले पाऊल मानले जात आहे.

सरकारची भूमिका आणि पुढील वाटचाल
राज्य सरकारने या मागण्यांबद्दल अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. तथापि, समाजातील तळागाळातील लोकांचे हे प्रश्न असून, त्यावर लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे असी भावना जनतेमध्ये आहे.

जर सरकारने यावर तत्काळ निर्णय घेतला नाही, तर या आंदोलनाची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. Bacchu Kadu हे केवळ आंदोलनकर्ते नेते नसून, ते जनतेच्या वेदनांचे प्रतिनिधी म्हणून पुढे आले आहेत.

Santosh Deshmukh Case: Valmik Karad ची संपत्ती जप्त होणार? जन्मठेप होऊ शकते पण कायदा काय सांगतो ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *