नाशिक जिल्ह्यातील मनमाड आणि पानेवाडी परिसरात 5 मे रोजी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली.
नागरिकांना दिलासा: उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा दिलासा मिळाल. Nashik Unseasonal Rain
शेतकऱ्यांचे नुकसान: पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे, आणि कांदा बियाण्यालाही मोठा फटका बसला आहे. आंबा बागांमधील फळांचे देखील नुकसान झाले आहे. Nashik Unseasonal Rain
आर्थिक चिंता: शेतकऱ्यांना आधीच उत्पादन खर्चात वाढ आणि बाजारभावाची अनिश्चितता यामुळे चिंतेत असताना, निसर्गाच्या या आणखी एका तडाख्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. Nashik Unseasonal Rain
मदतीची मागणी: स्थानिक शेतकरी वर्गाने प्रशासनाकडे तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्याची आणि मदत देण्याची मागणी केली आहे.
Spread the loveसंजय राऊत यांनी जागा वाटप प्रक्रियेमध्ये झालेल्या उशिरावर आणि त्याच्या परिणामांवर भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, किशोर जोरगेवार यांना राष्ट्रवादीकडून लढवण्यासाठी आग्रह होता. मात्र, जागा मिळाली नाही, आणि जोरगेवार भाजपात जाऊन विजयी झाले. “जागा वाटपाची प्रक्रिया लांबली गेल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. कार्यकर्त्यांना कामासाठी वेळ मिळाला नाही, अस्वस्थता पसरली,” असे राऊत म्हणाले. त्यांनी महायुतीचे उदाहरण देत सांगितले की, त्यांच्याकडे जागा वाटप दोन महिने आधीच झाले होते. राऊत यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विधानांवरही प्रतिक्रिया दिली. “जागा वाटपात झालेला विलंब आणि त्याचे दुष्परिणाम टाळता आले असते. काँग्रेसच्या जास्त जागा मिळाव्यात, हा आग्रह होता. मात्र, सर्वात कमी जागा काँग्रेसनेच जिंकल्या,” असे ते म्हणाले. त्यांनी चंद्रपूरची जागा उदाहरण म्हणून मांडली. “किशोर जोरगेवार विजयी होणार असल्याचे वारंवार सांगण्यात आले होते. मात्र, ती जागा 17 दिवस वादात राहिली आणि शेवटी भाजपाच्या हातात गेली,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आणि प्रत्येक पक्षाची स्वतःची भूमिका यामुळे झालेल्या चुका त्यांनी कबूल केल्या. त्यांनी सांगितले की, लोकसभेनंतरही योग्य समन्वय राखला नाही तर भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागेल. “महाविकास आघाडीची जागा वाटप प्रक्रिया योग्य पद्धतीने हाताळली असती तर परिस्थिती वेगळी असती,” असे राऊत यांनी ठामपणे सांगितले.
Spread the lovePrarthana Behere Marathi actress Prarthana Behere ज्यांना ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘पवित्र रिश्ता’ आणि इतर चित्रपटांसाठी ओळखलं जातं, तिने आपल्या चाहत्यांसोबत एक खास आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिच्या घरात आता एक नविन छोटा पाहुणा आला आहे, जो आहे एक गोडसपणा असलेलं puppy, ज्याचं नाव तिने ‘Reel’ असं ठेवलंय. Prarthana ने आपल्या Instagram वर ‘Reel’ च्या काही गोड फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती ‘Reel’ला आपल्या हातात धरताना दिसतेय. तिने आणि तिच्या नवऱ्याने ‘Reel’ला दत्तक घेतलं आहे आणि तिच्या नवऱ्याबद्दलही तिने खास आभार मानले आहेत. तिच्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, “Meet my new baby – Reel. Dogs know exactly who needs them in life and they fill that emptiness in the most unexpected ways. अभिषेक, thank you for giving Reel a beautiful new home and the best life. I promise never to disappoint you.” Prarthana चं प्राण्यांप्रती प्रेम फार गाहीर आहे. ती लग्नाआधीही एक कुत्रा ‘Gabbar’ पाळत होती. लग्नानंतर घरात अजूनही अनेक प्राणी आहेत, जसे की 7 कुत्रे, गायी आणि 10-12 घोडे जे तिच्या नवऱ्याच आहेत. प्रार्थना ने हसत म्हणलं की, “मी जवळपास 15-16 मुलांची आई आहे.” ही बातमी अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी आली आहे, त्यामुळे ती आणखी खास ठरली आहे. चाहत्यांनीही ‘Reel’ला आणि प्रार्थना परिवाराला भरभरून प्रेम दिलंय. Prarthana Behere Morning vs. Night Skincare Routine – What’s the Difference?
Spread the loveतुझ्या डोक्यात घाणच भरलीय,अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, समाजाच्या नियमांविरोधात बोलण्याचा कोणालाही परवाना मिळालेला नाही. ही अश्लीलता नाही तर काय आहे? आई-वडिलांना, बहिणींना लाज वाटेल असे तुमचे शब्द आहेत. अश्या कठोर शब्दांमध्ये Ranveer ला सुप्रीम कोर्टाने सुनावलं आहे, तसेच त्याला या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणताही शो करता येणार नाहीये. म्हणूनच नेमकं आजच्या सुनावणीत कोर्टाने काय म्हटलंय? रणवीरची बाजू मांडणाऱ्या वकिलांना कोर्टाने कोणता प्रतिप्रश्न केलाय? इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारणाऱ्या रणवीर अलाहबादियाविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. त्याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यामध्ये त्याच्याविरुद्धचे सर्व एफआयआर एकत्र करावेत, अशी विनंती करण्यात आली होती. तसेच, याप्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणीही रणवीरनं केली होती. आणि त्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे पुत्र वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयात रणवीर अलाहबादियाची बाजू मांडली. “जीभ कापण्यासाठी 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. एका माजी कुस्तीपटूनं म्हटलंय की, आपण कोणत्याही पक्षात भेटलो तरी, त्याला सोडता कामा नये. हे सर्व 10 सेकंदांच्या क्लिपसाठी.” असं म्हणत जेव्हा रणवीरचे वकील अभिनव चंद्रचूड त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोर्टाने ते रणवीरच्या भाषेचा बचाव करत आहेत का? असा सवाल विचारला तर “धमकी देणाऱ्यांनाही रणवीरसारखंच चर्चेत राहण्याचा शौक असेल.” असं कोर्टाने म्हटलं आहे. “जर हे अश्लील नाही तर काय आहे? तुम्ही तुमचा अश्लीलपणा आणि असभ्यपणा कधीही दाखवू शकता… फक्त दोनच एफआयआर आहेत. एक मुंबईत आणि एक आसाममध्ये… स्वातंत्र्य हा वेगळा मुद्दा आहे. प्रत्येक बाबतीत तुम्हीच लक्ष्य असता आणि तुम्हीच त्यात सामील असता असं नाही. समजा 100 एफआयआर आहेत, तर तो म्हणू शकतो की, तो स्वतःचा बचाव करू शकत नाही.अशा वर्तनाचा निषेध केला पाहिजे. फक्त तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून तुम्ही समाजाला हलक्यात घेऊ शकत नाही. जगात असा कोणी आहे का? ज्याला अशी भाषा आवडेल? ज्याच्या डोक्यात खूप काहीतरी वाईट चाललंय. आपण त्यांचा बचाव का करावा?” अश्या शब्दात रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे. तर आजच्या सुनावणीतील महत्वाचे मुद्दे काय आहेत ते पाहुयात. “रणवीरविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांप्रकरणी त्याला अटकेपासून दिलासा दिला असून यानंतर रणवीरविरोधात त्या विधानांसाठी कोणताही नवीन गुन्हा दाखल होणार नाही, जर अलाहाबादियाला स्वतःच्या जीविताला धोका आहे असं वाटत असेल, तर तो महाराष्ट्र किंवा आसामच्या स्थानिक पोलिसांकडे संरक्षणाची मागणी करू शकतो. रणवीर अलाहाबादियानं त्याचा पासपोर्ट ठाणे पोलिसांकडे जमा करावा, न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्याला विदेश प्रवास करता येणार नाही असं . तर रणवीर अलाहाबादियानं या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणताही शो करू नये.” असं कोर्टाने आजच्या सुनावणीत म्हंटलं आहे. सध्या तरी Ranveer च ते एक वक्तव्य त्याला भरपूर महागात पडताना दिसतंय, बाकी या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे… तर यावर तुमचे मत काय?.