pahalgam attack.jpg
Crime India आजच्या बातम्या राष्ट्रीय

Pahalgam Attack -शुद्धीवर आलो तेव्हा आजूबाजूला मृतदेह पडले होते

Spread the love

Pahalgam Attack Update

जम्मू काश्मीरच्या Pahalgam येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक नागरिक उपस्थित होते, ज्यामुळे त्यांनी या थरारक घटनेचा अनुभव प्रत्यक्ष पाहिला. नवी मुंबईतील सुबोध पाटील यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत या भयानक अनुभवाबद्दल सांगितले.

दहशतवादी हल्ल्याचा अनुभव

सुबोध पाटील म्हणाले, “गोळीबाराचा आवाज ऐकताच आम्ही खाली जमिनीवर झोपलो. गोळी चाटून गेल्याने बेशुद्ध पडलो होतो, पण जाग आली तेव्हा आजूबाजूला मृतदेह पडलो होते.” त्यांनी पुढे सांगितले की, “पाठून आवाज आला. कसला आवाज आहे, हे आम्हाला आधी कळलं नाही. आम्ही मागे वळून पाहिलं तेव्हा लोक धावत होते. म्हणून आम्हीही घाबरलो होतो. काही लोक खाली झोपले. मग आम्ही खाली झोपलो.”

सुबोध यांना एक दहशतवादी दिसला, ज्याने विचारले, “हिंदू कोण आहे?” या प्रश्नामुळे सर्वजण घाबरले. त्यानंतर दहशतवादीने गोळीबार सुरू केला. “त्याने झाडलेली एक गोळी माझ्या मागून गेली, त्यामुळे मी बेशुद्ध झालो,” असे ते म्हणाले.

मदतीचा हात

सुबोध पुढे सांगतात, “मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह पडले होते. मी शुद्धीवर आल्याचं तेथील एका स्थानिकाने पाहिलं. त्याने मला पाणी दिलं आणि मला त्याच्या पाठीवर बसवून बाहेर आणलं. बाहेर बाईकवरून त्याने मला हॉस्पिटलला नेलं. तिथे प्रथोमपचार करून  हेलिकॉप्टरमध्ये बसवून लष्करी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे मी सात दिवस दाखल होतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *