महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांमध्ये CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परीषदेत या निर्णयाबद्दल लेखी माहिती दिली. २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE अभ्यासक्रम लागू होईल. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, असे सरकारने सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली याबाबत बैठक घेण्यात आली होती, ज्यामध्ये राज्यातील शालेय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी CBSE पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, CBSE अभ्यासक्रमाच्या मराठीमध्ये पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्यात येतील, आणि शैक्षणिक सत्र १ एप्रिलपासून सुरू होईल.
मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाला गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले, तसेच शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येईल, असा विश्वास व्यक्त केला.