Jaykumar Gore प्रकरणात आजवर अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तर या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीचं चालतं होत्या. पण आज स्वतः मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर भाष्य करत, या प्रकरणाशी संबंध असल्याचं म्हणत Supriya Sule and Rohit Pawar यांचा या सगळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. तर याप्रकरणी पुढील चौकशी होणार असल्याचं देखील स्पष्ट केलय. म्हणूनच देवेंद्र फडणवीस विधानभवनात काय म्हणाले? त्यांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर कोणते गंभीर आरोप केले आहेत? काही दिवसांपूर्वी अचानक २०१६ सालाच जयकुमार गोरे यांचं प्रकरण समोर आलं होत. त्यानंतर हळू हळू या प्रकरणाने जोर पकडला आणि रोज नवनवीन माहिती आणि खुलासे या प्रकरणात होत होते. ज्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती. याकाळात अनेक आरोप करण्यात आले, अश्यातच जयकुमार गोरे यांना धमकी देणाऱ्या महिलेला खंडणी घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे या प्रकरणाला एक नवीनच वळण लागले. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार? याकडे अनेकांचं लक्ष्य लागले होते. अश्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर सभागृहात भाष्य करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली घटना दुदैवी आहे. कोणाला जीवनातून उठवण्याच्या उद्देशाने राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांच्यासंदर्भातील केस 2016 मध्ये घडली, 2019 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता देखील झाली होती. ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते. त्यानंतर अचानक हे प्रकरण उकरून काढले गेले. अशा प्रकरणांमध्ये कुटुंबात, समाजात अपमान होईल या भीतीपोटी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मी जयकुमार गोरे यांच्या हिमतीची दाद देतो. त्यांना ज्यावेळी लाजेची मागणी झाली त्यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार केली. तेव्हा ट्रॅप लावण्यात आला. सगळी मागणी, संवाद टेप झाला. पोलीस विभागाची खात्री पटल्यानंतर सापळा रचून कॅश देताना आरोपीला पकडण्यात आले. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता.” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यांनी विधानभवनात केलं. या वेळी सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात काय समोर आलं आहे, याबद्दल देखील माहिती दिली आहे. ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला, युट्युबर व पत्रकार तुषार खरात आणि अनिल सुभेदारसह काही लोकांचा हा नेक्सस असल्याचं आढळलं आहे. हे सर्व एकमेकांशी संबंधित आहेत. या लोकांनी जो कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत, ते सगळे सापडले आहेत. दुदैवाची गोष्ट म्हणजे या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते थेट संपर्कात दिसत आहेत. प्रभाकरराव देशमुख यांच्याशी आरोपी बोलत होते. त्याहीपेक्षा वाईट वाटतं की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातसोबत झाले आहेत. तसेच आरोपींनी तयार केलेले व्हिडीओ देखील त्यांना पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असून, आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे, हे देखील त्यांनी स्प्ष्ट केलं आहे. तर “शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीवर काय परिणाम होत असेल? याचा विचार आपण करायला हवा. आपण राजकीय शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत, अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे कान देखील टोचले आहेत
Tag: Rohit Pawar
Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या मृत्यूसंबंधी नवा खुलासा तिच्या मित्राने सांगितला घटनाक्रम
Disha Salian मृत्यू प्रकरण, ज्यामध्ये सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन यांचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला, पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे. सतीश सालियन आता मृत्यूच्या बाबतीत हत्या झाल्याचा गंभीर आरोप करत आहेत. ८ जून २०२० च्या रात्री नेमके काय घडले? दिशा सालियनच्या मित्राने एका व्हॉट्सऍप ग्रुपवर त्या रात्री घडलेला घटनाक्रम शेअर केला होता. ८ जून २०२० रोजी दिशा सालियनच्या घरात तिच्या मित्रांसह आणि प्रियकरासोबत पार्टी सुरू होती. पार्टीत दिशा मद्यपान करत होती आणि ती तिच्या करिअरवर निराश होती, अशी माहिती दिली गेली आहे. दिशा वारंवार म्हणत होती, “माझ्या कोणालाही काळजी नाही,” असे ती मित्रांना सांगत होती. काही वेळाने ती अचानक तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. मित्रांनी आणि प्रियकराने दरवाजा ठोठावला, परंतु प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यानी दरवाजा तोडला. तेव्हा दिशा बाल्कनीतून खाली पडलेली दिसली. त्यानंतर मित्रांनी तातडीने दिशाला रुग्णालयात दाखल केले, पण त्यावेळी डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. दिशाच्या मृत्यूचा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येशी संबंध? सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या झाल्यानंतर काही लोकांनी दिशा सालियनच्या मृत्यूचे सुशांतच्या मृत्यूशी जोडले. भाजपाचे नेते नारायण राणे यांनी असा आरोप केला होता की दिशा सालियनवर बलात्कार झाला आणि तिचा खून करण्यात आला. दिशाने सुशांतला या अत्याचाराची माहिती दिली होती, असेही ते म्हणाले. त्यानंतर सुशांतला धमक्या दिल्या जात होत्या, असे सांगितले गेले. १३ जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे या दोन घटनांचा संबंध जोडला गेला. तपास आणि नवीन घडामोडी २०२१ मध्ये पोलिसांनी तपास पूर्ण करत सांगितले की या प्रकरणात कोणतीही संशयास्पद बाब सापडलेली नाही. त्यानंतर, डिसेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारने तीन सदस्यांची एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, एसआयटी अहवाल अद्याप राज्य सरकारला मिळालेला नाही. पोलिसांनी केलेल्या तपासणीत दिशा राहत असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेज तपासलेल्या. त्यात काही वेगळी बाब समोर आलेली नाही. त्याच रात्री दिशा केवळ एकदाच इमारतीबाहेर बाहेर आली होती, आणि ती पार्सल घेण्यासाठी खाली गेली होती. तसेच, ती गर्भवती असल्याचा दावा उत्तरीय तपासणीत खोडला गेला होता.
Disha Salian Case: Aditya Thackeray ला Shinde आणि Ajit Dada गटाकडून समर्थन
Disha Salian च्या मृत्यूप्रकरणाची चर्चा एकदां पुन्हा सुरू झाली आहे, ज्यात नव्या आरोपांचा समावेश आहे आणि तपासाची पुनर्रचना करण्याची मागणी करण्यात आली आहे. Disha चे वडील, सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण गरम झालं आहे, परंतु अनपेक्षितपणे शिंदे आणि अजित दादा गटातील दोन मोठे नेते आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. Disha Salian प्रकरणात नवीन काय घडले? Disha सालियनचे वडील, त्यांच्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावर भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र, शिंदे गट आणि अजित दादा गटाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्या बचावात आपला आवाज उठवला आहे. आदित्य ठाकरे यांना शिंदे आणि अजित दादा गटाकडून समर्थन Sanjay Gaikwad, Shinde गटाचे प्रमुख नेते, म्हणाले की, Disha च्या मृत्यूप्रकरणात CID तपासात कोणत्याही राजकीय नेत्यांचा सहभाग नाही. त्यांनी सांगितले की, तपासात आदित्य ठाकरे यांना क्लिन चिट देण्यात आली होती कारण त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही. “आता तीन वर्षं शिंदे गटाचं सरकार आहे, यावरून कोणतेही नवीन पुरावे समोर आले नाहीत,” असे त्यांनी म्हटले. अमोल मिटकरी यांचे विचार Ajit Dada गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या नव्या याचिकेवर गंभीर शंका उपस्थित केली. त्यांचा प्रश्न आहे की, इतक्या वर्षांनंतर याचिका का दाखल केली गेली आणि राज्यात आणि देशात इतर मुद्द्यांवर राजकारण का चालवलं जात आहे? त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, विरोधक आणि सत्ताधारी दोघांनीही राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याऐवजी Disha Salian प्रकरणाला हवा देऊ नये. रोहित पवार यांचे आदित्य ठाकरे समर्थन NCP नेते रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना स्पष्टपणे समर्थन दिले. त्यांचा विश्वास आहे की आदित्य ठाकरे यांचा Disha Salian च्या मृत्यूसोबत काहीही संबंध नाही. “भाजप या प्रकरणात राजकारण करत आहे, आणि याचा उद्देश आगामी बिहार निवडणुकांमध्ये फायदा मिळवणे आहे,” असे पवार यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, “आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आणि तपासाने ते सिद्ध केलं आहे.”