Devendra Fadnavis शी वाकडं म्हणजे मसनात लाकडं. एकदम परफेक्ट मॅच होत नाही म्हणा. पण भाजप म्हणजे सबकुछ Devendra Fadnavis. हे तर सगळ्यांना माहीतचं आहे. सध्या भाजपमधला एक नावं असंच अज्ञातवासात टाकलं जाातयं. त्याचं नाव आहे Sudhir Mungantiwar. काही महिन्यांपुर्वी भाजपाचा एक आमदार कार्यक्रम आयोजित करतो, या कार्यक्रमात काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रम अध्यक्षांचा सन्मान दिला जातो. तर भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असणाऱ्या Sudhir Mungantiwar यांचं निमंत्रण पत्रिकेत सगळ्यात शेवटी नाव असतं. आणि मंग सुरू होतं ते कार्यक्रमाच राजकारण. तर हे राजकारण अखेर येऊन ठेपतं ते सुधीर मुनगंटीवार यांच्या भोवती. चंद्रपूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्या दरम्यानची ही घटना. पण प्रश्न फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये तर मागील अनेक वेळा मुनगंटीवारांना डावललं गेल्याचं पहायला मिळालंय म्हणूनच खरंच सुधीर मुनगंटीवार यांना डावललं का ? डावललं तर कोणी डावललं. जोरगेवारांनी कि भाजपने की फडणवीसांनी. पण प्रश्न हा फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये, लोकसभेवेळी Sudhir Mungantiwar नी त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तरी सुद्धा पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिलं, त्यावेळी Sudhir Mungantiwar राज्यात कोणाला नकोसे झाले आहेत? अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. तर त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील मुनगंटीवार यांना भाजपाकडून तिकीट मिळेल का नाही यावर साशंकता व्यक्त केली जात होती. अश्यातच मुंडेंना तिकीट मिळालं ते विजयी देखील झाले मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते असून देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. आणि आता हा कार्यक्रम. त्यामुळे भाजपा कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांना संपवू पाहतेय अशा चर्चा देखील जोर धरत आहेत मात्र याचं काय कारण असू शकत ते पाहूया. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचाच भाग असून देखील अनेकदा त्यांनी कोणत्याही घटनेवर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे तर त्यांच्या या भूमिकांमुळे भाजपा पक्षाला किंवा भाजपच्या नेतृत्वावर त्याचा विपरीत परिणाम हॊईल का नाही याचा देखील विचार करत नव्हते. खास करून 2019 मध्ये भाजपा-सेना युती तुटल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे या बाबत नाराजी व्यक्त केली होती. आणि सुधीर मुनगंटीवार यांचा हाच स्पष्ट वक्तेपणा भाजपला अडचणीत आणू शकतो म्हणून पक्षाकडून येथूनच त्यांना दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात झाली असं बोललं जात. दरम्यानच्या काही काळात Sudhir Mungantiwar हे सक्रिय राजकारणातून बाहेर असल्याच पाहायला मिळालं. तर मागील महायुती सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रिमंडळात कोणतेही महत्त्वाचं मंत्रिपद देण्यात आल नव्हत. आणि लोकसभेला झालेल्या पराभवानंतर Sudhir Mungantiwar हे अजूनच राज्याच्या राजकारणातून बाहेर पडत गेले आणि हे सगळं भाजपाकडून जाणीवपूर्वक केलं गेलं, ज्या मागे हेतू एकच होता तो म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा राजकारणातील हस्तक्षेप कमी करणे. एकंदरीत काय तर महाराष्ट्रात Devendra Fadnavis ना कुणीही पर्याय झालेला खुद्द त्यांना किंवा कदाचीत दिल्लीतल्या भाजप नेत्यांनाही चालत नाहीये. यासाठी विनोद तावडेंना केंद्रात पाठवण्यात आलं. या विधानसभेच्या आदल्या दिवशी त्यांना पैशासहित पकडल्याच्या बातम्यांनी त्यांची महाराष्ट्रातली घरवापसीही कायमची रद्द झाली. पंकजा मुंडे इतक्या दिवस शांत बसुन कमबॅक करण्याची वाट पाहत होत्या. त्यात विधानसभेतील पराभव, लोकसभेतील पराभव तरीही मंत्रीमंडळातील संधी यामुळे बॅकफुटवर गेलेल्या मंत्रीमंडळातील संधीमुळे थोड्या स्थिरस्थावर झाल्या. मात्र फडणवीसांना शह देतील अशी परिस्थिती त्यांची सध्यातरी नाहीये. यानंतर येतं सर्वांना माहीत असलेलं एकनाथ खडसेंच नाव. भावी मुख्यमंत्री म्हणून बघीतलं गेलेल्या या नेत्याचा अक्षरशः बाजार उठवला गेला. जेवढी हेळसांड विरोधी पक्षात असताना झाली नव्हती तेवढी भाजप सत्तेत आल्यापासून झाली. कारण एकचं देवेंद्र फडणवीस. वाचा अजून संबंधित बातम्या-Narendra Modi यांच्या हातून सत्ता जाण्याचे संकेत : Chandrababu Naydu यांच्या नावाची चर्चा
Tag: Political News
MP Salary Increase: महागाईच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर खासदारांच्या वेतनात 24% वाढ, इतर खर्चातही वाढ
MP Salary Hike News: 2023 पासून खासदारांच्या वेतनात 24% वाढ होणार आहे. स्वातंत्र्यानंतर खासदारांच्या वेतनात 250% वधार झाला आहे. महागाई वाढल्याने केंद्र सरकारने संसदीय सदस्यांच्या वेतन आणि भत्त्यात वाढ केली आहे. या वेतनवाढीमुळे मार्च 2023 पासून खासदारांच्या पगारात बदल होईल. साधारण नागरिकांसाठी वेतनवाढीचा निर्णय कधी होईल हे अजून अनिश्चित असताना, खासदारांच्या पगारात वाढ होणार असल्याने त्यांना फायदे मिळतील. या वेतनवाढीविषयी अनेक चर्चा सुरू आहेत, आणि इतर सोयी-सुविधांच्या खर्चातही मोठी वाढ होईल. श्रेणी पूर्वीची रक्कम सध्याची रक्कम खासदारांचे मासिक वेतन ₹1,00,000 ₹1,24,000 दैनिक भत्ता (संसदीय सत्रात) ₹2,000 प्रति दिवस ₹2,500 प्रति दिवस माजी खासदारांचे मासिक वेतन ₹25,000 ₹31,000 अतिरिक्त पेन्शन (प्रत्येक कार्यकाळानंतर) ₹2,000 प्रति महिना ₹2,500 प्रति महिना टिकाऊ फर्निचर भत्ता (प्रत्येक कार्यकाळात) ₹80,000 प्रति महिना ₹1,00,000 प्रति महिना गैर-टिकाऊ फर्निचर भत्ता (प्रत्येक कार्यकाळात) ₹20,000 प्रति महिना ₹25,000 प्रति महिना खासदारांना मिळणाऱ्या इतर सुविधा: स्वातंत्र्यानंतर खासदारांच्या वेतनवाढीचा इतिहास: वर्ष खासदारांचे वेतन (प्रति महिना) 1947 ₹400 1962 ₹500 2006 ₹16,000 2009 ₹50,000 2018 ₹1,00,000 2025 ₹1,24,000 स्वातंत्र्यानंतर 250 टक्क्यांनी वाढस्वातंत्र्यानंतर खासदारांच्या पगारात पहिल्या काही दशकांत एक छोट्या प्रमाणात वाढ झाली. 1947 मध्ये खासदारांना 400 रुपये दरमहाचा पगार मिळत होता. त्यानंतर, 1962 मध्ये त्यात 100 रुपयांची वाढ करण्यात आली आणि तो 500 रुपयांवर गेला. त्यानंतर 2006 मध्ये 16,000 रुपयांवर, 2009 मध्ये 50,000 रुपयांवर आणि 2018 मध्ये 1 लाख रुपये करण्यात आले. आता 2025 मध्ये खासदारांच्या वेतनात 24% वाढ करून त्यांना 1 लाख 24 हजार रुपये मिळणार आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपासून खासदारांच्या वेतनात 250 पट वाढ झाली आहे
Kunal Kamra आणि एकनाथ शिंदे गटाचा वाद, कविता आणि तोडफोड: राजकीय वर्तुळात खळबळ
स्टँडअप कॉमेडियन Kunal Kamra पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. यावेळी त्याने आपल्या स्टॅन्डअप शोमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता सादर केली. या कवितेचा विषय एकनाथ शिंदे यांच्या राजकीय निर्णयांवर आणि शिवसेनेतून भाजपसोबत युती करण्यावर होता. कामराच्या या कवितेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुणाल कामराने 23 मार्च 2025 रोजी ‘नया भारत – अ कॉमेडी स्पेशल’ या शोमध्ये आपली कविता सादर केली. या कवितेत त्याने शिंदे यांच्यावर तीव्र टीका करत त्यांना “गद्दार” असे संबोधले आहे. कविता सादर करतांना त्याने महाराष्ट्रातील 2022 च्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले, जेव्हा शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपसोबत हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्रीपद स्वीकारले. कामरा हा त्याच्या तिखट आणि बिनधास्त राजकीय व्यंगासाठी ओळखला जातो. त्याने याआधी देखील अनेक राजकीय नेत्यांवर आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून टीका केली आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि त्याच्या व्हिडिओंना मोठा प्रतिसाद मिळतो. कामरा हा आपल्या “Shut Up Ya Kunal” या यूट्यूब पॉडकास्टसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्यात राजकीय नेत्यांशी गप्पा मारताना तो अनौपचारिक शैलीत चर्चेस भाग घेतो. कामरा हे अनेकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टसाठी वादात ओढले जातात. 2018 मध्ये त्यांच्या काही ट्विट्समुळे वाद निर्माण झाला होता, त्यानंतर त्यांनी आपले ट्विटर अकाउंट डिलीट केले होते. तसेच, 2019 मध्ये त्यांना कार्यक्रम उधळण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या. यावेळी कामरा याच्या कवितेने शिंदे गटाला चांगलेच संतप्त केले आहे. शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात शिवसैनिक खुर्च्या, टेबल आणि लाइट्स तोडताना दिसत आहेत. दुसरीकडे, ठाकरे गटाने या कवितेचे स्वागत केले आहे. संजय राऊत यांनी कामराच्या कवितेला “कमाल” असे म्हटले असून शिंदे यांच्याविरुद्धच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, शिंदे यांनी शिवसेनेची मूलभूत विचारधारा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सोडून सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी केली. कुणाल कामराची कविता केवळ एक व्यंग्य न राहता महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे आणि शिंदे गटांमधील संघर्षाला नवे वळण देणारी ठरली आहे. एकीकडे शिंदे गट आक्रमकपणे कारवाईची मागणी करत आहे, तर ठाकरे गटाने या कवितेचा वापर शिंदे यांच्याविरुद्ध प्रचारासाठी सुरू केला आहे. शिंदे गटाने कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. कामरावर मानहानी किंवा प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवला जाऊ शकतो. मात्र, कामराने आपल्या X हॅण्डलवरून संविधानाच्या प्रतीसोबतचा फोटो टाकत पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, असे म्हटले आहे. यापूर्वीच्या वादांप्रमाणे तो आपल्या मतांवर ठाम राहतो की माफी मागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Dhananjay Munde राजीनामा प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर अखेर राजीनामा!
Dhananjay Munde यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्ट इशाऱ्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा थेट इशारा? राजीनामा टाळण्यासाठी प्रयत्न झाले, पण… काल रात्रीच्या तणावपूर्ण घडामोडीनंतर आज सकाळी धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंडे यांना यापूर्वी अनेकदा वॉर्निंग देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती गांभीर्याने घेतली नाही. पुढील राजकीय परिणाम काय असतील? मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होऊ शकते. पुढे कोणत्या मोठ्या घडामोडी होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
वाल्मिक कराड प्रकरण – अमित शाह
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा अद्याप बाकीबीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्येला एक महिना उलटूनही या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. कुटुंबीयांनी मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचे नाव जबाबात घेतले आहे. तरीही कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. बजरंग सोनावणे अमित शाह यांना भेटणारबीडचे खासदार बजरंग सोनावणे हे या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी शाह यांच्याकडे वेळ मागितली असली तरी ती अद्याप मिळालेली नाही. वाल्मिक कराड यांना आरोपी ठरवण्याची मागणीदेशमुख कुटुंबाने तपास अधिकाऱ्यांबद्दल शंका उपस्थित करत तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला आहे. बजरंग सोनावणे यांनीही तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आहे. न्यायाची प्रतीक्षासध्या संतोष देशमुख हत्येचा तपास अनेक अडचणींनी भरलेला आहे. बजरंग सोनावणे यांच्या पुढील पावलं काय असतील आणि अमित शाह यांच्या भेटीतून काय निष्पन्न होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.