Meghalaya Murder Case:
Crime ताज्या बातम्या

Meghalaya Murder Case: सोनमने उघड केला रक्तरंजित कट

मेघालय हत्याकांड: सोनमच्या प्रेमातील कटामुळे पती राजा रघुवंशीचा खून!Meghalaya Murder Case: संपूर्ण देशाला हादरवणारा आणि प्रेमाच्या आड आलेल्या विवाहित नात्याला कलंकित करणारा एक भयंकर गुन्हा उघडकीस आला आहे. मेघालयमध्ये हनीमूनसाठी गेलेल्या Indor च्या नवविवाहित दांपत्यात असा काही कट रचला जाईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. पण पोलिसांनी केलेल्या तपासात जे काही समोर आलं, ते अंगावर शहारे आणणारं आहे. सोनम रघुवंशीनेच आपल्या पती राजा रघुवंशीचा खून करण्याची सुपारी दिल्याचं स्पष्ट झालं आहे. हनीमूनचं निमित्त, पण मनात खूनाची योजना!राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे दोघं इंदौरचे रहिवासी. त्यांच्या लग्नाला काही आठवडेच झाले होते. त्यांनी मेघालयला हनीमूनसाठी जाण्याचे नियोजन केले. 23 मे रोजी त्यांना शेवटचं जिवंत पाहिलं गेलं. त्यानंतर त्यांचा काहीही संपर्क झाला नाही. अखेर 2 जून रोजी मेघालयच्या चेरापूंजीवरील सोहरारिम भागात एका दरीतून राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला. सोनमचं षड्यंत्र उघडकीसपोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि सोनमवर संशयाची सुई वळली. मेघालय पोलिसांनी आणि इंदौर क्राइम ब्रांचने मिळून सोनमची चौकशी केली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली – सोनमचं राज कुशवाहा नावाच्या तरुणाशी अफेयर चालू होतं आणि त्याच्यासोबत मिळून तिने पतीच्या हत्येचा कट रचला. सुपारी देऊन खूनपोलिस तपासात सामने आलं की सोनम आणि राज कुशवाहाने मिळून मध्य प्रदेशातील तीन तरुणांना – विक्की ठाकूर, आनंद आणि आकाश यांना सुपारी देऊन राजा रघुवंशीचा खून घडवून आणला. हे तीनजण हनीमूनच्या बहाण्याने मेघालयला पोहोचले आणि योग्य क्षणाची वाट पाहून राजाचा खून केला. आरोपींना अटकहत्येनंतर सोनम आणि राज दोघे एकत्र पळून गेले. उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये त्यांच्याकडे पोलिसांनी अटक केली. याव्यतिरिक्त खून करणाऱ्या तिघांनाही मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि प्रकरणाच्या पुढील तपासासाठी मेघालयला हलवण्यात आले आहेत. प्रेम, फसवणूक आणि हत्या – समाजाला धक्का देणारी गोष्टया entire incident म्हणजे प्रेमाच्या आड आलेलं विवाहित नातं व त्यातून जन्मलेलं हिंसक षड्यंत्र आहे. एका महिन्याच्या आतच सोनमने आपल्या पतीचा विश्वासघात केला व त्याच्या जीवाशी खेळ केला. प्रेम व खुनाचा संगम घडवणाऱ्या या incident ने समाजात अस्वस्थता व संतापाची लाट उसळवली आहे. पोलिसांची तात्काळ कृती व तपासमेघालय पोलिसांनी तत्परतेने हे प्रकरण लवकर उघडकीस आले. इंदौर क्राइम ब्रांच आणि मेघालय पोलिसांनी संयुक्तरित्या या प्रकरणाचा तपासताना आरोपींना अटक केली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने सुरुवातीला आत्मसमर्पण केल्याचे वृत्त पसरले होते, पण नंतर स्पष्ट झालं की तिला अटकच करण्यात आली होती. सोनमला वन स्टॉप सेंटरमध्ये हलवलंसोनमलाला अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन येताच नि वहि मेहुलाला ‘सखी वन स्टॉप सेंटर’ मध्ये हलवण्यात आलं. हे केंद्र महिलांसाठी असुरक्षिततेच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाण म्हणून कार्यरत आहे. सामाजिक प्रतिक्रियाही घटना उघड झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. लोकांनी सोनम आणि राज कुशवाहा या दोघांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “प्रेमासाठी पतीचा खून” ही कल्पनाच समाजासाठी धोकादायक आहे, असं अनेकांनी मत व्यक्त केलं आहे. काय शिकलं पाहिजे?ही एक शिकवण आहे की नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा, विश्वास आणि संवाद किती गरजेचे आहे. सोशल मीडिया किंवा बाह्य आकर्षणांमुळे लग्नासारख्या नात्यांमध्ये फुट पडू नये, याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. Meghalaya Murder Case हे प्रकरण म्हणजे एक क्रुर गुन्हेगारी आणि मानवी भावनांचा भयंकर संगम. नव्याने संसार सुरू केलेला एक तरुण असतो तेव्हा त्याच्यावर आपल्या पत्नीनेच सुपारी दिली आणि खून करवून घेतला. यामागे प्रेम, असंतोष, लोभ, आणि बिनधास्तपणा यांचे गहिरे जाळं आहे. Kolhapur Viral Murder: लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीची हत्या! | Love Story की क्राइम स्टोरी? Nalasopara Murder Mistry: अज्ञात बॉडी, बाजूला कंडोम आणि रडणारी मुलं, हृदय हेलावून टाकणारा शेवट

Mumbai Local Accident:
आजच्या बातम्या ताज्या बातम्या

Mumbai Local Accident :धावत्या ट्रेनमधून १२ प्रवासी पडले

Mumbai हादरली! धावत्या लोकलमधून १२ प्रवासी रुळावर पडले; ६ जणांचा मृत्यू Mumbai – देशाची आर्थिक राजधानी असलेली आणि ‘लोकल’चा प्राणवायू म्हणून ओळखली जाणारी मुंबई आज पुन्हा एकदा एका भीषण अपघातामुळे हादरली. सकाळी गर्दीच्या वेळी Mumbai Local Accident मध्ये १२ प्रवासी धावत्या ट्रेनमधून रुळावर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, यातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. नेमकी घटना काय घडलै? घटना आज morning ie savwva nink ते saade ninking दरम्यान घडली. पुष्पक एक्स्प्रेस ही सीएसएमटीहून (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) morning ie ८ वाजून २५ मिनिटांनी निघाली होती. आणि मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान या ट्रेनमध्ये अतिरेकित गर्दी होती. त्यामुळे काही प्रवासी दरवाज्याला लटकून प्रवास करत होते. याच वेळी अचानक काही प्रवासी तोल जाऊन खाली रुळावर पडले. प्रत्यक्षदर्शींचं काय म्हणणं?घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीतकमी १० ते १२ प्रवासी ट्रेनमधून पडल्याचं त्यांनी पाहिलं. अपघात घडल्यानंतर काही जखमींना तातडीने जवळच्या प्लॅटफॉर्मवर आणून वैद्यकीय मदत मिळवून देण्यात आली. मात्र, ६ जणांचा मृत्यू झाल्याचं दुःखद वास्तव समोर आलं आहे. गर्दीचा गंभीर परिणामदरवषी शाळा, कॉलेज, नोकरीच्या वेळेस लोकल ट्रेनमध्ये होणारी गर्दी जीवघेणी ठरते. आजच्या घडामोडीतसुद्धा तेच पहायला मिळालं. सकाळच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये दरवाज्याशी लटकून प्रवास करणं सामान्य झालं आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे गंभीरतेने पाहिलं नाही, तर असे अपघात वारंवार घडत राहतील. रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रियामध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितलं की, “मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान पाच प्रवासी ट्रेनमधून पडले, एवढीच माहिती सधYा आपल्याला मिळाली,” अधिकृत तपशील अजूनहरेल्वेकडे स्पष्ट नाही. रुग्णवाहिका तातडीने पाठवण्यात आल्या असून जखमींवर उपचार सुरू आहेत. सरकार आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष?मुंबईसारख्या शहरात प्रतिदिन लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेकडून फार काही ठोस उपायोजन करण्यात आलेल्या नाहीत. आजच्या Mumbai Local Accident मध्ये घडलेली घटना ही प्रशासनाच्या अपयशाचे मोठे उदाहरण आहे. पुष्पक एक्स्प्रेसची माहितीपुष्पक एक्स्प्रेस ही मुंबई ते लखनऊदरम्यान धावणारी ट्रेन असून, या ट्रेनमध्ये आज प्रवाशांनी अनधिकृतरित्या लटकून प्रवास केल्याची माहिती आहे. सध्या ही ट्रेन एक्सप्रेस असूनदेखील, लोकलसारखीच प्रवासी वाहतूक करत आहे. त्यामुळे सुरक्षा नियमांचा भंग मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे. उपाय काय असू शकतात?दरवाजे आपोआप लॉक होण्याची यंत्रणा लागू करणे. प्रवासी क्षमतेनुसार तिकीट विक्री मर्यादित करणे. गर्दीच्या वेळेस अतिरिक्त लोकल सेवा सुरु करणे. प्रवाशांना जागरूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवणे. सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक आणि तत्काळ मदत सेवा उपलब्ध करून देणे. सामाजिक माध्यमांवर संतापघटनेनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी रेल्वे प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत #MumbaiLocalAccident हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. सरकारकडून आणि रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत जाहीर झालेली नाही. Mumbai Local Accident ही घटना एक इशारा आहे. मुंबईकरांचे जीवन म्हणजे लोकल ट्रेन. जर या जीवनवाहिनीमध्येच सुरक्षितता नसेल, तर हे सरकार आणि प्रशासनासाठी गंभीर विचार करण्यासारखे आहे. आज घडलेला हा दुर्दैवी अपघात कधीही टाळता आला असता, जर योग्य नियोजन, सुविधा आणि प्रवाशांप्रती संवेदनशीलता असती. Santosh Deshmukh Case: Valmik Karad ची संपत्ती जप्त होणार? जन्मठेप होऊ शकते पण कायदा काय सांगतो ?

Santosh Deshmukh Murder Case:
Crime Updates ताज्या बातम्या

Santosh Deshmukh Murder Case: कराड दोषमुक्त? कायदेशीर लढा

Santosh Deshmukh Murder Case :बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज साधारण ६ महिने झाले असतील. पण या प्रकरणात गुन्ह्याची सिद्धता बाकी असल्याने आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाहीं. मंगळवारी बीडच्या विशेष न्यायालयात हि प्रकरणी सुनावणी पार पडली. Santosh Deshmukh हत्या प्रकरण – कायदा, राजकारण आणि न्यायालयीन लढाई या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्जवल निकम उपस्थित होते. Santosh Deshmukh हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी. अशी मागणी निकम यांनी न्यायालयाकडे केली. सोबतच गुन्ह्यातील सर्व आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करावेत असा युक्तिवाद यावेळी निकम यांनी केला. या प्रकरणात आरोपींशी संबंधीत सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत.असं निकम यांनी सांगितलं होतं यावर आरोपींच्या वकिलांनी हरकत घेतली होती. आणि आत्ताच आरोप निश्चित करता येणार नाहीत असा युक्तिवाद केला होता तसेच त्यांनी “वारंवार मागणी करून अजूनही आम्हाला डिजिटल पुरावे मिळाले नाहीत असे सांगितले. याबरोबरच मुख्य आरोपींवर लावण्यात आलेले मकोका कलम हटवण्यात यावे. म्हणजेच काय तर वाल्मिक कराडची मकोकातून मुक्तता करण्यात यावी आणि अगोदर या संदर्भात एक सुनावणी घेण्यात यावी. अशी मागणी आरोपींचे वकील विकास खाडे आणि मोहन यादव यांच्याकडून करण्यात आली आहे. मकोका काय आहे आणि तो इतका कठोर का मानला जातो? Santosh Deshmukh Murder Case या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर मकोकाच्या तरतुदी लागू होणार कि नाही हे 17 जूनला होणाऱ्या सुनावणीमधूनच कळेल.पण न्यायालयाने कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर पुढील सुनावणी 17 जूनला होणार असल्याचे सांगितले आहे. पण असा प्रश्न उपस्थित केला जातोय कि, वाल्मिक कराडने मकोकातून सुटकेसाठी अर्ज का केलाय? त्याला यातून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? कराड कोणत्या आधारावर मकोकातून मुक्त होण्याची शक्यता आहे? कराडची संपत्ती जप्त का करायला पाहिजे? एकूणच या प्रकरणामधील सर्व शक्यता आणि घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत! Santosh Deshmukh हत्या प्रकरणातील आरोपींची ओळख उघड झाली. संघटित गुन्हेगारी केल्यामुळे वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी करण्यात आलेला हा कायदा अत्यंत कठोर मानला जातो. एखाद्यावर कायदा लागू झाल्यानंतर आरोपीची सर्व मालमत्ता जप्त केली जाते. मकोका कायद्यामधील कलम 20 आणि IPC च्या तरतुदीनुसार आरोपींची संपत्ती जप्त होणे महत्वाचे ठरते. गुन्हेगारी प्रकार म्हणजेच खंडणी, धमकी आणि बेकायदेशीर व्यवसाय करून किंवा वसूलीतून संपत्ती मिळवली असेल तर ती बेकायदेशीर मानली जाते. वाल्मिक कराडवर त्याने कमावलेली संपत्ती ही संघटित गुन्हेगारीतून कमावली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी कराडच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या संपत्तीचे पुरावे दाखवले. वाल्मिक कराडकडे 2000 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं आमदार धस यांनी सांगितलं होत. ही सगळी संपत्ती जप्त करण्यात यावी! त्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात तसा अर्जही केला होता. आरोपींची लवकरात लवकर संपत्ती जप्त करण्याचा अर्ज करण्याचे कारण म्हणजे मालमत्ता जप्तीमुळे त्यांचे आर्थिक बळ कमी होईल. त्यांचे गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आणि तपासात अडथळा येणार नाही यासाठी तसेच आरोपींची संपत्ती लपवली जाऊ नये किंवा इतरांच्या नावे करणे किंवा विकू नये यासाठी न्यायालयाने संपत्ती जप्त करण्याचे आदेश द्यावेत. असा अर्ज सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता मात्र त्या अर्जावर सुनावणी होण्याअगोदरच वाल्मिक कराडला मकोकातून दोषमुक्त करा, असा अर्ज बचाव पक्षाने न्यायालयात सादर केला होता. या अर्जावर युक्तिवाद करण्यात यावा, त्यासंबंधीचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अशी विनंती बचाव पक्ष म्हणजेच आरोपींच्या वकिलांनी केली आहे. न्यायालयाने याच अर्जावर 17 जूनला पुढील सुनावणी होईल असं सांगितल आहे. राजकारणाचा संदर्भ आणि मुंडे कनेक्शन पण मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडने “मला मकोकातून दोषमुक्त करा” असा अर्ज का केला ? याबद्दल जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. आणि या चर्चेचे प्रमुख कारण म्हणजे वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवे हात मानल्या जातो. दोघे बिसनेस पार्टनर असल्याचेही बोलले जाते. दोघांची बरीच मालमत्ता एकत्र आहे ते अनेक कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत. धनंजय मुंडेची मोठी संपत्ती कराडच्या आणि त्याच्या परिवाराच्या नावावर आहे. जर मकोकाच्या नियमानुसार सगळी सगळी संपत्ति जप्त झाली तर वाल्मिक कराड पेक्षा मोठे नुकसान हे धनंजय मुंडे यांचे होईल. म्हणून हा अर्ज सादर केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात असे आणि यासारखे अनेक खुलासे सामाजिक कार्यकर्त्या अंजाली दमानिया यांनी केले आहेत. तसेच त्यांनी यासंदर्भात काही कायदेशीर कागदपत्रे दाखवली होती. वाल्मीक कराडची हजारो कोटींची संपत्ती जप्त होऊ नये यासाठीच त्याने मकोकातून दोषमुक्तीचा अर्ज केल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. शिवाय आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाल्यास मकोका अंतर्गत किमान पाच वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा होत असते. त्यामुळे पुढील सुनावणी सूनवणी दरम्यान वाल्मिक कराडची मकोकातून खरच सुटका होईल की काय? असा प्रश मागे उरला आहे.पण तुम्हाला माहीत आहे का ? एखाद्या आरोपीवर मकोका लागू झाल्यानंतर कोणत्या निकषांच्या आधारे त्याची दोषमुक्तता होऊ शकते. कराडचा दोषमुक्ततेसाठी प्रयत्न आणि कायद्यातील पळवाटा पहिलं कारण समोर येत ते म्हणजे पुरव्यांचा अभाव.. मकोका अंतर्गत दोषमुक्तीसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुराव्याची कमतरता, संबंधित प्रकरणामध्ये जरका सरकारी पक्ष आरोपींविरुद्ध ठोस आणि पुरेसे पुरावे सादर करू शकला नाही तर न्यायालय आरोपीला दोष मुक्त करू शकते. मकोका अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीशी संबंध, गुन्ह्याची नियमित पद्धत आणि गंभीर गुन्हे सर्वांचा परस्पर संबंध असल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट करावे लागते. त्यात दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कायद्यातील काही त्रुटी.. मकोका अंतर्गत खटला दाखल करण्यासाठी काही कायदेशीर गोष्टींचे पालन करावे लागते.जसे की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मंजुरी.. जर ही मंजुरी योग्य पद्धतीने घेतलेली नसेल किंवा प्रक्रियेमध्ये काहीचुका झाल्या असतील तर बचाव पक्ष या मुद्द्यावर आरोपींना दोषमुक्त करण्याची मागणी करू शकतो. तिसर कारण आहे.. साक्षीदारांचे खंडन म्हणजे न्यायालयात, एका साक्षीदाराने दिलेली साक्ष चुकीची किंवा खोट्या प्रकारे मांडलेली आहे. असे सिद्ध केले तर बचाव शक्य आहे. संपत्ती जप्तीमागे काय उद्देश आहे? मकोका लागू झाल्यानंतर आरोपींचा कबूली जवाब हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. परंतु जर कबूली जवाब सक्तीने घेतला असेल किंवा त्याची खात्री कमी असेल तर तो न्यायालयात टिकत नाही. यात मकोकातून दोषमुक्त होण्यासाठी बचाव पक्षाचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरतो. बचाव पक्षाला संधी असते की ते आरोपींच्या निर्दोषपणाचे पुरावे सादर करू शकतात किंवा सरकारी पक्षाच्या पुराव्यांना आव्हान देखील देऊ शकतात.यामध्ये आरोपी घटनेच्या वेकी गुणहयाच्या ठिकाणी नव्हता, साक्षीदारांचे खंडन करणे किंवा तांत्रिक त्रुटी दाखवणे अशा गोष्टींचा समावेश असतो. अशा प्रकरणामध्ये न्यायालयाचा निकालसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो, जितका वकिलांचा युक्तिवाद महत्वाचा ठरतो. मकोका अंतर्गत दाखल झालेला खटला हा विशेष मकोका कोर्टात चालवला जातो. जर सरकारी पक्ष ठोस पुरावा देत गुन्हा सिद्ध करू शकला नाही तर न्यायाधीश आरोपीला दोषमुक्त करू शकतात. एखाद्या आरोपीच्या दोषमुक्ततेचा निकाल हा पूर्णपणे पुराव्यांच्या सत्यातेचे मूल्यमापन, केसची कायदेशीर प्रक्रिया आणि आरोपींच्या साक्षीदारांच्या जबाबावर अवलंबून असतो. समजा आरोपीला मकोका अंतर्गत दोषी जरी ठरवण्यात आले तरीही तो उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतो. परंतु, उच्च न्यायालयात अपील करताना कायदेशीर चुका आणि पुराव्याचा अभाव दाखवावा लागतो. तसेच या प्रक्रियेतील चुका दाखवून

Made in India iPhones
Budget 2025 enjoying Entertainment India Tech आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या

Made in India iPhones अमेरिकेत अमेरिकेत, Tim Cook यांची घोषणा

Made in India iPhones अमेरिकेत Made in India iPhones ची विक्री होणार, Tim Cook यांची घोषणा जागातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक असलेली Apple या वर्षाच्या अखेरीस भारतात आणखी रिटेल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. Apple चे CEO Tim Cook यांनी गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे की येत्या काळात अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश iPhones भारतातच बनवले जातील. उत्पादन युनिट चीनमधून हलवणे Tim Cook म्हणाले की, Apple हळूहळू आपले उत्पादन युनिट चीनमधून हलवत आहे आणि भारताला नवीन मॅन्युफॅक्चरिंग हब बनवत आहे. केवळ iPhones साठीच नव्हे, तर इतर उत्पादनांसाठीही Apple आपले चीनवरील अवलंबित्व कमी करत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ. अमेरिका-चीन वाटाघाटींची स्थिती Apple चे CEO Tim Cook म्हणाले की, अमेरिकेबाहेर विकली जाणारी Apple ची बहुतेक उत्पादने अजूनही चीनमध्येच तयार केली जातील. सध्या अमेरिका चीनमधून येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर 145 टक्क्यांपर्यंत जड टॅरिफ (आयात शुल्क) लावत आहे, आणि अमेरिका-चीन वाटाघाटी सध्या रखडल्या आहेत. भारतात iPhones ची निर्मिती का? आतापर्यंत बहुतांश iPhones चीनमध्ये बनवले जात होते, पण अमेरिकेने चीनवर लादलेले भरमसाठ टॅरिफ आणि चीनकडून प्रत्युत्तरात्मक टॅरिफ यामुळे Apple ला फटका बसू लागला. यामुळे कंपनी हळूहळू भारतात उत्पादन वाढवत आहे. Tim Cook यांनी म्हटले आहे की, सध्याच्या टॅरिफ अटी बदलल्या नाहीत तर Apple ला या तिमाहीत सुमारे 90 कोटी रुपयांचे (सुमारे 7,500 कोटी रुपये) नुकसान होऊ शकते. इतर उत्पादनांची निर्मिती Apple च्या इतर उत्पादनांबद्दल बोलताना, Tim Cook म्हणाले की, अमेरिकेत विकले जाणारे iPad, Mac, Apple Watch आणि AirPods सारखी उत्पादने आता व्हिएतनाममध्ये तयार केली जातील. म्हणजेच केवळ iPhones साठीच नव्हे, तर इतर उत्पादनांसाठीही Apple आपले चीनवरील अवलंबित्व कमी करत आहे. भारतातील विक्रीची वाढ Apple ने सांगितले की, गेल्या वर्षी त्यांनी भारतात 22 अब्ज डॉलर (सुमारे 1.83 लाख कोटी रुपये) किंमतीचे iPhones बनवले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 60 टक्के जास्त आहे. याशिवाय, या तिमाहीत भारतात पुन्हा विक्रमी विक्री झाल्याचेही Apple ने म्हटले आहे. या सर्व घटनांमुळे Apple भारतात आणखी रिटेल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे भारतीय बाजारात त्यांच्या उपस्थितीला अधिक बळ मिळेल. ‘मेड इन इंडिया’ iPhones च्या विक्रीमुळे भारताच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

IRCTC
India Tips And Tricks ताज्या बातम्या महाराष्ट्र

IRCTC: रेल्वेच्या नियमांत बदल, आता वेटिंग तिकिट असलेल्यांना स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवेश नाही

IRCTC: रेल्वेच्या नियमांत बदल, आता वेटिंग तिकिट असलेल्यांना स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवेश नाही IRCTC News Update -भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवाशी प्रवास करत असतात. आता याच प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने १ मे २०२५ पासून एक मोठा बदल लागू केला आहे. नवीन नियमांनुसार, प्रतीक्षा यादीतील तिकिटे असलेल्या प्रवाशांना स्लीपर किंवा एसी कोचमधून प्रवास करण्याची परवानगी मिळणार नाही. नियमांचे मुख्य मुद्दे प्रवाशांची सोय उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन शशी किरण यांनी सांगितले की, “कन्फर्म तिकिटे असलेल्या प्रवाशांची सोय सुनिश्चित करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.” अनेकदा, प्रतीक्षा तिकिटे असलेले प्रवासी कन्फर्म तिकिटे असलेल्या प्रवाशांच्या जागांवर बसण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे सर्व प्रवाशांना गैरसोय होते. प्रवासाची तयारी जर प्रवाशांना स्लीपर किंवा एसी क्लासमध्ये प्रवास करायचा असेल, तर त्यांनी प्रवासाच्या तारखेपूर्वी त्यांची तिकिटे कन्फर्म करावीत. जनरल कोचमध्ये आरक्षणाची आवश्यकता नसते, त्यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशी जनरल कोचमधून प्रवास करू शकतात. या नवीन नियमामुळे भारतीय रेल्वेच्या प्रवासात अधिक सुव्यवस्था येईल, आणि कन्फर्म तिकिट धारकांना अधिक आरामदायक प्रवास अनुभवता येईल. प्रवाशांनी या बदलांची माहिती ठेवून त्यानुसार तयारी करणे आवश्यक आहे.

Maharashtra Day 2025
action Agricalture enjoying Entertainment India International News आजच्या बातम्या ताज्या बातम्या महाराष्ट्र

Maharashtra Day 2025: संघर्ष, हुतात्मे आणि राजकारण – मुंबई कशी झाली ‘महाराष्ट्राची’?

Maharashtra Day 2025: संघर्ष, बलिदान आणि राजकारण! Maharashtra Day 2025 म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस नाही, तर तो मराठी अस्मितेचा आणि बलिदानाचा दिवस आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मुंबई ही त्याची राजधानी झाली. परंतु यामागे संघर्ष, रक्तपात, आणि हजारो आंदोलकांचे बलिदान दडलेले आहे. 📜 राज्य पुनर्रचनेचा कायदा आणि संघर्षाची सुरुवात १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना कायदा (States Reorganization Act) लागू झाला आणि भाषेच्या आधारे राज्यांची पुनर्रचना झाली. त्यामुळे मुंबई राज्य अस्तित्वात आले. पण, या नव्या राज्यात मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषिक लोक होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने ही मागणी केली की मराठी आणि कोकणी भाषिकांसाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र’, तर गुजराती आणि कच्छी भाषिकांसाठी ‘गुजरात’ हे राज्य निर्माण करावे. 🔥 21 नोव्हेंबर 1956: संघर्षाचा निर्णायक दिवस राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करू नये असा निर्णय दिला. या निर्णयाचा मराठी लोकांनी तीव्र विरोध केला. चर्चगेट आणि बोरीबंदर येथून निघालेला मोर्चा फ्लोरा फाउंटन येथे एकत्र आला. घोषणा देत आंदोलक एकवटले. पोलिसांनी लाठीचार्ज केला. सत्याग्रही हटले नाहीत. तेव्हा तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचा आदेश दिला. या गोळीबारात १०६ आंदोलक हुतात्मा झाले. 🕊️ हुतात्म्यांचे बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे सरकारवर दबाव आला आणि अखेर २५ एप्रिल १९६० रोजी बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 संसदेत मंजूर झाला. १ मे १९६० पासून महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली आणि हुतात्म्यांच्या त्यागाने मराठी जनतेच्या हक्काचा विजय झाला. 🏛️ हुतात्मा स्मारक आणि आजचा दिवस १९६५ साली फ्लोरा फाउंटन परिसरात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन ( Maharashtra Day 2025 )साजरा केला जातो. यावेळी राज्य सरकारकडून परेड, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि राजकीय भाषणे आयोजित केली जातात. 📣 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व – Maharashtra Day 2025 🧾 निष्कर्ष Maharashtra Day 2025 हा केवळ एक उत्सव नाही, तर एका मोठ्या लढ्याची आठवण आहे. मुंबई महाराष्ट्रात आली यामागे सामान्य मराठी जनतेचा संघर्ष आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे बलिदान आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. १ मे रोजी आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि शौर्याचा गौरव करण्याची हीच खरी वेळ आहे. Best Sunscreens in India: Top-Rated Picks for 2025 How to Get Rid of Acne Scars Naturally: Best Skincare Tips

RAID 2 vs KESARI 2
Bollywood ताज्या बातम्या राष्ट्रीय सिनेमा

“RAID 2 vs KESARI 2 Box Office War: अजयची फिल्म एडव्हान्स बुकिंगमध्ये मागे टाकलं अक्षयला!”

 RAID 2 vs KESARI 2 RAID 2 ची Advance Booking केसरी 2 पेक्षा पुढे! Bollywoodच्या या summer मध्ये अजय देवगनची RAID 2 आणि अक्षय कुमारची KESARI 2 यांच्यात जबरदस्त competition सुरू आहे. Latest reports नुसार, RAID 2 ने 69,000+ tickets advance मध्ये बुक केले आहेत, तर KESARI 2 काही percentage मागे आहे. 📊 Box Office Numbers Breakdown: 🎬 90s Stars Dominating 2025: ह्या वर्षी 90s चे superstars पुन्हा BO वर राज्य करत आहेत: 💥 काय आहे RAID 2 चा USP? 🧐 Industry Experts चे मत: “RAID 2 has edge in metros, while KESARI 2 rural areas मध्ये strong आहे. Opening day 15-18cr range मध्ये जाऊ शकते.” – Taran Adarsh, BO Analyst

Indian Air Force
India Trending Updates ताज्या बातम्या

Pahalgam Attack: Indian Air Force पाकिस्तानला कडक उत्तर देणार

पाकिस्तानला दिला गेलेला कडक संदेश भारताने आपल्या सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क केले आहे. पाकिस्तानसाठी हे एक चिंतेचे कारण बनले आहे, कारण Indian Air Force ने “आक्रमण” युद्धाभ्यास सुरु केला आहे. हा अभ्यास पाकिस्तानच्या सीमा जवळ केल्या गेलेल्या त्याच्या वायुसेनेच्या कडक गस्तीचा इशारा देतो. Indian Air Force ने राफेल आणि सुखोई-30 जेट्ससह एक पूर्ण तयारी सुरू केली आहे, आणि यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये घबराट निर्माण झाला आहे. पाकिस्तानी वायुसेनाही आपल्या चौकशी सुरू करायला बाध्य झाली आहे. त्यामुळे सीमा ओलांडून भारताच्या तयारीचा एक मानसिक दबाव पाकिस्तानवर निर्माण झाला आहे. विविध यंत्रणांची समन्वयित तयारी Indian Air Force आणि नौसेनेच्या युद्धाभ्यासामुळे भारताच्या लष्करी क्षमतेला एक नवा आयाम मिळाला आहे. भारतीय नौसेनेने INS विक्रांत या अत्याधुनिक विमानवाहक पोताची तैनात केलेली आहे. या युद्धपोतावर मिग-29K जेट्स आणि हेलिकॉप्टर्सची तैनाती केली गेली आहे. याच्या सहाय्याने भारतीय नेव्ही समुद्रातील धोक्यांवर लक्ष ठेवू शकते, आणि हल्ल्यांच्या तयारीसाठी ती सक्षम होईल. हे सर्व भारताच्या आक्रमक तयारीचे स्पष्ट संकेत देत आहेत, आणि पाकिस्तानला ते शांत बसवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भारताच्या आर्मी चीफचा दौरा आणि निरीक्षण भारताच्या आर्मी चीफ जनरल उपेन्द्र द्विवेदी यांनी श्रीनगरमध्ये सुरक्षेची समीक्षा करण्यासाठी दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यात, लष्करी रणनीतीबद्दल उच्चस्तरीय चर्चा होणार आहे. याशिवाय, पहलगाम येथील त्या ठिकाणीही ते जातील, जिथे निहत्थ्या टूरिस्ट्सवर हल्ला करण्यात आला होता. या दौऱ्याने पाकिस्तानच्या युद्धाभ्यासाच्या परिस्थितीला गंभीर रूप दिले आहे. भारतीय लष्कराने या हल्ल्याच्या प्रतिक्रियेत अधिक सशक्त पावले उचलली आहेत आणि त्याचवेळी पाकिस्तानसाठी एक जणू युद्धाची तयारी दर्शविली आहे. राफेल जेट्स आणि सुखोई-30 जेट्स: पाकिस्तानवर दबाव पाकिस्तानला वळण देण्यासाठी Indian Air Force चे राफेल आणि सुखोई-30 जेट्स ला महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. या विमानांच्या तैनातीमुळे Indian Air Force ला अधिक शक्यता आणि सामर्थ्य मिळाले आहे. हे जेट्स न फक्त आक्रमण करण्यासाठी, परंतु भारताच्या सीमा रक्षणासाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. राफेल जेट्स आणि सुखोई-30 जेट्स हे अत्याधुनिक प्रौद्योगिकीने सुसज्ज आहेत, ज्यामुळे भारताला पाकिस्तानच्या आक्रमकता नष्ट करण्याची ताकद मिळाली आहे. याचा सर्वात मोठा परिणाम पाकिस्तानवर होऊ शकतो. पाकिस्तानमध्ये मानसिक दबाव वाढलेला पाकिस्तानसाठी याच सर्व घटनांचा मोठा परिणाम झाला आहे. Indian Air Force च्या युद्धाभ्यासाच्या परिणामामुळे, पाकिस्तानी सैनिक अधिक सतर्क झाले आहेत. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानवर अधिक दबाव निर्माण केला होता, आणि त्याच प्रकारे आज देखील भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर मोठा दबाव आणला आहे. भारताच्या सैन्याने पाकिस्तानच्या क्षेत्रात घुसून आतंकवादी ठिकाणं नष्ट केली होती, आणि आता भारतीय वायुसेना पुन्हा एकदा तेच करण्याची तयारी करत आहे. पाकिस्तानी लष्कर आणि वायुसेनेला आता एकच चिंता आहे, की भारत युद्धासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. पाकिस्तानची रणनीतिक कोंडी Indian Air Force ने आणि नौसेनेने ज्या पद्धतीने त्यांचा युद्धाभ्यास सुरू केला आहे, तो पाकिस्तानसाठी एक कोंडी बनला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण रणनीतीला भारताच्या सामर्थ्यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांची सीमा रक्षण किमान एक महत्त्वाची चाचणी असू शकते. भारताच्या सशक्त तयारीच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणांना निश्चितच कडक प्रतिसाद द्यावा लागेल. आर्थिक आणि सामरिक दृष्टिकोनातून पाकिस्तानच्या तयारीतील कमतरता पाकिस्तानच्या आर्थिक आणि सामरिक ताकदच्या तुलनेत, भारत अधिक सशक्त आणि सुसज्ज आहे. भारतीय सैन्याच्या आधुनिकरणाचा वेग आणि त्यांची कार्यक्षमता पाहता, पाकिस्तानला अधिक काळजी करण्याची आवश्यकता आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या विविध युद्धाभ्यास आणि त्यांच्या तयारीने पाकिस्तानला एकच संदेश दिला आहे – भारत कोणत्याही परिस्थितीत त्याच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये कमी पडणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला पाकिस्तानच्या सैन्याच्या सामरिक क्षमतेवर विचार करण्यास भाग पडेल. भारताने सुरु केलेल्या “आक्रमण” युद्धाभ्यास व पाकिस्तानच्या सीमा जवळच्या तयारीने एकच संदेश दिला आहे की भारत पाकिस्तानला समजावून सांगण्यासाठी तयार आहे. Indian Air Force व नौसेना त्यांचं कार्यक्षम व सक्षम प्रदर्शन करत आहेत, व यामुळे पाकिस्तानच्या कानात थोड्या धडधडीची वाजत आहे. त्यामुळे भारताच्या सैन्याने तयार केलेल्या या रणनीतीनंतर पाकिस्तानला आपली सुरक्षा व सैन्य तंत्रज्ञान पुन्हा एकदा तपासून पाहावे लागेल. भारताच्या आक्रमक तयारीने पाकिस्तानवर मानसिक आणि सामरिक दबाव वाढवला आहे, जो भविष्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी आपल्या सामर्थ्याचा संकेत दिला आहे. भारताच्या लष्करी आणि वायुसेनेने आपल्या तयारीवर लक्ष ठेवलं आहे, आणि पाकिस्तानला त्या हालचालींचा थोडक्यात पण सशक्त संदेश दिला आहे. भारताच्या आक्रमक तयारीने पाकिस्तानमध्ये गोंधळ निर्माण केला आहे, आणि यामुळे भविष्यातील संभाव्य युद्ध किंवा संघर्षासाठी अधिक तणाव असू शकतो. Pahalgam terror attack: सेलिब्रिटी आणि खेळाडूंचा संतप्त आवाज Salted Fried Rice मुळे वाचलं एक अख्खं कुटुंब, Kashmir Terror Attack Escape! #pahalgamnews #indianews

walmik karad
Bollywood India ताज्या बातम्या सिनेमा

walmik karad : Film Producer की गुन्हेगारी संबंध? Actual Truth

walmik karad प्रकरण: एक नवीन वळण? बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या निर्घृण हत्येनंतर चार महिन्यांनी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेत मुख्य मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले आहे. walmik karad फिल्म इंडस्ट्रीशी संबंध? आता या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे. बीडच्या सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी मोठा दावा केला आहे की walmik karad हा एक फिल्म प्रोड्यूसर होता. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. BRJ फिल्म प्रोडक्शन आणि इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशनचे सभासदत्व सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल झाले आहेत, ज्यात: या व्हायरल फोटोंमध्ये त्याला इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशनचा (IMPPA) आजीवन सभासद म्हणून देखील दाखवले जात आहे. राजकीय आणि गुन्हेगारी संबंध? वाल्मिक कराडचे राजकीय आणि गुन्हेगारी जगतात मोठे नेटवर्क असल्याची चर्चा आहे. काही रिपोर्ट्सनुसार, तो केवळ फिल्म इंडस्ट्रीत नव्हता तर गुन्हेगारी कनेक्शनही मजबूत होते. याआधी त्याचे नाव बीड जिल्ह्यातील विविध आर्थिक आणि राजकीय वादांमध्ये समोर आले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीत याची अजून सखोल तपासणी होणार आहे. सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोकांचा विश्वास आहे की वाल्मिक कराड हा प्रत्यक्षात गुन्हेगारी जगतातील मोठा मास्टरमाईंड आहे आणि फिल्म प्रोड्यूसर ही केवळ त्याची बनावट ओळख आहे The Power of AI in Digital Marketing: Stay Ahead in 2025

KIVI FRUIT SUCESS FARM
Agricalture ताज्या बातम्या

Success Story: किवी फळ शेतीने शेतकऱ्यांचे नशीब चमकवलं, वर्षाला करताय लाखोंची कमाई

Kiwi Fruit Farming: हिमाचलच्या शेतकऱ्यांची यशोगाथा हिमाचल प्रदेशातील शेतकरी आता पारंपरिक शेती सोडून बागायती आणि नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. टोमॅटो, सिमला मिरची, सोयाबीन, वाटाणे, आले आणि लसूण यासारख्या पिकांमधून चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल बदलत आहे. विशेषतः सिरमौर जिल्ह्यातील पच्छाड भागात किवीच्या शेतीत मोठी वाढ झाली आहे. येथील शेतकऱ्यांनी किवी शेतीतून लाखोंची कमाई केली असून, त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणही याकडे वळत आहेत. किवी शेती कशी सुरू झाली? सिरमौर जिल्ह्यातील नरग उप-तहसीलच्या थलेडी गावातील प्रगतशील शेतकरी विजेंद्र सिंह ठाकूर यांनी 1990 च्या दशकात किवी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एलिसन आणि हेवर्ड या जातींची 100 रोपे लावून शेती सुरू केली. चार वर्षांनी त्यांनी बागेत आणखी 50 रोपे लावली आणि हळूहळू किवी शेतीचा विस्तार केला. आज त्यांच्या बागेतून दरवर्षी 50 क्विंटल किवी उत्पादन घेतले जाते, ज्यामुळे त्यांना 10 लाखांहून अधिक उत्पन्न मिळते. 1993 मध्ये नरेंद्र पवार या प्रगतशील शेतकऱ्यानेही किवी शेतीला सुरुवात केली. त्यांनी नौनी येथील डॉ. वाय. एस. परमार फलोत्पादन आणि वनीकरण विद्यापीठातून 150 किवी रोपे विकत घेतली आणि किवी लागवडीचे बारकावे शिकून घेतले. सध्या पवार यांच्या बागेत 300 हून अधिक किवीची झाडे असून, त्यांनी यावर्षी 90 क्विंटल किवी उत्पादन मिळवले आहे. त्यामुळे त्यांना 15 लाखांपेक्षा अधिक नफा झाला आहे. यामुळे पच्छाड परिसरात किवीचे क्षेत्र 16 हेक्टरपर्यंत वाढले आहे. मुख्यमंत्री किवी प्रोत्साहन योजना हिमाचल प्रदेश सरकारने मुख्यमंत्री किवी प्रोत्साहन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान आणि तांत्रिक मदत पुरवण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत 100 किवी रोपे लावण्यासाठी 1.6 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. याचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला असून, राज्यभर किवी लागवडीला मोठा वाव मिळत आहे. किवी शेतीसाठी आवश्यक हवामान आणि जमीन किवी फळाची शेती साधारणतः 4,000 ते 6,000 फूट उंचीच्या भागात केली जाते. थंड आणि दमट हवामान किवी शेतीसाठी आदर्श मानले जाते. किवीची लागवड करण्यासाठी चांगली निचरा होणारी चिकट किंवा वालुकामय जमीन सर्वोत्तम ठरते. किवीच्या लोकप्रिय जाती: किवी लागवडीची प्रक्रिया 1. योग्य जागेची निवड 2. रोपांची निवड आणि लागवड 3. खत व्यवस्थापन 4. सिंचन आणि तणनियंत्रण 5. फळतोडणी आणि विक्री किवी खाण्याचे आरोग्यदायी फायदे 1. प्लेटलेट्स वाढवते किवी फळ रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी प्रभावी आहे. 2. प्रतिकारशक्ती वाढवते यामध्ये व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. 3. पचनसंस्थेस मदत करते किवीमध्ये असलेले फायबर्स आणि एन्झाइम्स पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. 4. हृदयासाठी उपयुक्त हे फळ कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते. नवीन शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी हिमाचल प्रदेशातील फलोत्पादन विकास अधिकारी राजेश शर्मा यांच्या मते, येथील हवामान किवी शेतीसाठी अनुकूल आहे आणि सरकारही यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत करत आहे. बेरोजगार तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन कृषी क्षेत्रात यश मिळवावे. निष्कर्ष किवी शेतीने अनेक शेतकऱ्यांचे जीवन बदलले आहे. सिरमौर जिल्ह्यातील विजेंद्र सिंह ठाकूर आणि नरेंद्र पवार यांची यशोगाथा हेच दर्शवते की आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि सरकारी मदतीच्या जोरावर लाखोंची कमाई करणे शक्य आहे. योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास किवी शेती हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. (डिस्क्लेमर: वरील माहिती अधिकृत स्रोतांवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.)