Jaykumar Gore प्रकरणात आजवर अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तर या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीचं चालतं होत्या. पण आज स्वतः मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर भाष्य करत, या प्रकरणाशी संबंध असल्याचं म्हणत Supriya Sule and Rohit Pawar यांचा या सगळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. तर याप्रकरणी पुढील चौकशी होणार असल्याचं देखील स्पष्ट केलय. म्हणूनच देवेंद्र फडणवीस विधानभवनात काय म्हणाले? त्यांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर कोणते गंभीर आरोप केले आहेत? काही दिवसांपूर्वी अचानक २०१६ सालाच जयकुमार गोरे यांचं प्रकरण समोर आलं होत. त्यानंतर हळू हळू या प्रकरणाने जोर पकडला आणि रोज नवनवीन माहिती आणि खुलासे या प्रकरणात होत होते. ज्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती. याकाळात अनेक आरोप करण्यात आले, अश्यातच जयकुमार गोरे यांना धमकी देणाऱ्या महिलेला खंडणी घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे या प्रकरणाला एक नवीनच वळण लागले. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार? याकडे अनेकांचं लक्ष्य लागले होते. अश्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर सभागृहात भाष्य करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली घटना दुदैवी आहे. कोणाला जीवनातून उठवण्याच्या उद्देशाने राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांच्यासंदर्भातील केस 2016 मध्ये घडली, 2019 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता देखील झाली होती. ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते. त्यानंतर अचानक हे प्रकरण उकरून काढले गेले. अशा प्रकरणांमध्ये कुटुंबात, समाजात अपमान होईल या भीतीपोटी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मी जयकुमार गोरे यांच्या हिमतीची दाद देतो. त्यांना ज्यावेळी लाजेची मागणी झाली त्यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार केली. तेव्हा ट्रॅप लावण्यात आला. सगळी मागणी, संवाद टेप झाला. पोलीस विभागाची खात्री पटल्यानंतर सापळा रचून कॅश देताना आरोपीला पकडण्यात आले. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता.” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यांनी विधानभवनात केलं. या वेळी सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात काय समोर आलं आहे, याबद्दल देखील माहिती दिली आहे. ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला, युट्युबर व पत्रकार तुषार खरात आणि अनिल सुभेदारसह काही लोकांचा हा नेक्सस असल्याचं आढळलं आहे. हे सर्व एकमेकांशी संबंधित आहेत. या लोकांनी जो कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत, ते सगळे सापडले आहेत. दुदैवाची गोष्ट म्हणजे या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते थेट संपर्कात दिसत आहेत. प्रभाकरराव देशमुख यांच्याशी आरोपी बोलत होते. त्याहीपेक्षा वाईट वाटतं की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातसोबत झाले आहेत. तसेच आरोपींनी तयार केलेले व्हिडीओ देखील त्यांना पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असून, आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे, हे देखील त्यांनी स्प्ष्ट केलं आहे. तर “शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीवर काय परिणाम होत असेल? याचा विचार आपण करायला हवा. आपण राजकीय शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत, अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे कान देखील टोचले आहेत
Tag: Supriya Sule
बरं झालं पक्ष फुटला” – सुप्रिया सुळे यांचा धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल!
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील “NCP Split” नंतर पक्षाच्या आढावा बैठकीत खासदार “Supriya Sule” यांनी मोठा स्फोट केला. “It’s good that the party split,” असं वक्तव्य करत त्यांनी स्पष्ट केलं की त्या अशा लोकांसोबत काम करू शकत नाहीत. विशेष म्हणजे त्यांनी माजी मंत्री “Dhananjay Munde” यांचं नाव न घेता त्यांच्यावर थेट निशाणा साधला. “बरं झालं की पक्ष फुटला” – सुप्रिया सुळे “Supriya Sule” म्हणाल्या, “माझी लढाई त्यांच्याबरोबर आधीपासून होती. मला कधी कधी वाटतं, बरं झालं की पक्ष फुटला. जर तो पक्षात असता, तर मी इथे राहिले नसते. मी अशा लोकांसोबत काम करू शकत नाही.” त्यांनी थेट “Dhananjay Munde” वर हल्ला करत म्हटलं, “जो पुरुष स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो, तो पुरुषच नाही!” अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. “NCP Split” आणि सुळे यांचा रोखठोक विचार “NCP Split” नंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत. एका बाजूला “Sharad Pawar” यांचं गटबांधणीचं राजकारण, तर दुसऱ्या बाजूला “Ajit Pawar” यांच्या नेतृत्वाखालील गट – अशा वेळी “Supriya Sule” यांनी पहिल्यांदाच इतक्या ठाम शब्दांत भूमिका स्पष्ट केली आहे. “मी कॉन्ट्रॅक्टरच्या पैशांवर राजकारण करत नाही. माझ्या हातावर एका आईने शब्द घेतला होता – न्याय देण्याचा! आणि मी तो शब्द मोडणार नाही.” अशा शब्दांत त्यांनी लोकांच्या भावना व्यक्त केल्या. पुढे काय? “Maharashtra Politics” आता अधिक तापणार आहे. “Dhananjay Munde” आणि इतर नेते या आरोपांवर काय प्रतिक्रिया देणार? आणि “Supriya Sule” यांच्या या वक्तव्याचा “NCP Split” नंतरच्या राजकारणावर काय परिणाम होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रातील राजकीय भूकंप: 7-8 मंत्र्यांचा बळी जाणार? संजय राऊतांचा मोठा दावा
महाराष्ट्रात राजकीय वादळ! 7-8 मंत्र्यांचा बळी जाणार? संजय राऊतांचा दावा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या धक्कादायक विधानांमुळे चर्चेला उधाण आले आहे. सुप्रिया सुळे यांनी “शंभर दिवसांत एक बळी गेला आहे, सहा महिन्यांत आणखी एक बळी जाणार” असे वक्तव्य करून खळबळ माजवली. त्यानंतर संजय राऊत यांनी तर अजून मोठा दावा करत “या सरकारमधील 7-8 मंत्र्यांचा बळी जाणार” असा आरोप केला. भाजपाचेच लोक मंत्र्यांना लक्ष्य करताहेत? संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार, महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्री राज्याचे वातावरण बिघडवत आहेत आणि त्यांच्या पतनासाठी भाजपाचेच काही लोक हत्यारे पुरवत आहेत. त्यांच्या मते, काही मंत्र्यांवर गंभीर आरोप असून लवकरच त्यांच्याविरोधात कठोर कारवाई होणार आहे. याच पार्श्वभूमीवर जयकुमार रावल यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत. राऊत यांनी दावा केला की, रावल को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठा घोटाळा करण्यात आला आहे आणि लाखो जनतेचा पैसा लाटला आहे. त्यांनी हे प्रकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्याचे जाहीर केले आहे. जयकुमार रावल यांच्यावर काय आरोप आहेत? औरंगजेबाच्या कबर प्रकरणावरून राऊतांचा सवाल महाराष्ट्रातील आणखी एक संवेदनशील मुद्दा म्हणजे औरंगजेबाच्या कबर प्रकरण. काही हिंदुत्ववादी गटांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती. या मुद्द्यावर संजय राऊत यांनी भाजप सरकारवर थेट निशाणा साधला. त्यांनी विचारले, “महाराष्ट्रात भाजपचेच सरकार आहे, मग कबर हटवण्यास अडथळा कोण घालत आहे?” तसेच, “हिंदुत्ववाद्यांचे लोक सत्तेत आहेत, मग शासनाने कबर हटवण्याचा आदेश का देत नाही?” असा सवाल उपस्थित केला. भविष्यातील राजकीय परिणाम काय असतील? संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केलेले हे गौप्यस्फोट महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. निष्कर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठे वादळ उठले आहे. भ्रष्टाचार, मंत्र्यांचे बळी, आणि हिंदुत्वाचा मुद्दा यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. येत्या काही महिन्यांत राज्याच्या राजकारणात मोठे फेरफार होतील का? संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या दाव्यांमागे किती तथ्य आहे? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नोंदवा.