Marathwada rain update :राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. Marathwada आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना या पावसाचा तडाखा बसला आहे. एका रात्रीत झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते, गावे, बाजारपेठा, शाळा, दवाखाने, शेती सर्व काही पाण्याखाली गेले. अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले असून, नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. Parbhani जिल्ह्यातील नुकसान परभणी जिल्ह्यात काल रात्री झालेल्या वादळी पावसाने पारंपरिक आणि नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अंबड तालुक्यातील रेनापुरी, दयाळा, भांबेरी गावांचा संपर्क नदी-नाले एक झाल्याने पूर्णपणे तुटला आहे. Latur जिल्ह्यातील परिस्थिती लातूरमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने भेटा-अंदोरा गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला. पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. भादा मंडळातील अनेक गावांमध्ये घराघरात पाणी शिरले असून जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. Beed जिल्ह्यातील परिस्थिती बीडच्या शिरूर कासारमध्ये दमदार पावसानंतर सिंदफणा नदीला प्रचंड पूर आला. नदीने रौद्ररूप धारण केल्याने घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाने नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परांडा तालुक्यातील गावं पाण्याखाली गेली आहेत. चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे घरं आणि शाळा पाण्यात बुडाली आहेत. परंडा तालुक्यात सुमारे 300 लोक नदीच्या पलीकडे अडकलेले असल्याची माहिती मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा कन्नड तालुक्यात वाकी नदीला पुन्हा एकदा पूर आला. पैठण तालुक्यातील राहुल नगर भागात 100 घरांमध्ये पाणी शिरले. अनेक गावं अजूनही पाण्याखाली असून नागरिकांना प्रशासनाकडून मदत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Jalna जिल्हा जालना, घनसावंगी आणि बदनापूर तालुक्यातील गावांना या पावसाने झोडपून काढले आहे. नद्या-नाले तुडुंब भरले असून, शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्यांवर पाणी वाहत असल्याने नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. धरणातून विसर्ग माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून 62 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतीचे नुकसान या पावसामुळे सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ज्वारी, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग यांसारखी खरीप पिकं पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाचा इशारा या अतिवृष्टीमुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र मालमत्तेचे आणि शेतीचे नुकसान प्रचंड आहे. Pik Vima yojna news : अतिवृष्टीतून सावरण्यासाठी पीक विमा योजना किती प्रभावी ठरतीये? सविस्तर विश्लेषण