सोलापुरच्या पुरग्रस्थ गावात जाऊन चमकोगीरीचा प्रयत्न शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारेंना चांगलाच भोवला. Solapur Collector Kumar Ashirwad यांनी वाघमारेंना चांगलचं धारेवरं धरलं. त्याचा व्हिडिओ व्हायरलं झाला. आणि नेटकर्यांनी त्यांच्यावर तोंडसुखही घेतलं. शिंदे गटाच्या प्रवक्त्या असणाऱ्या आणि सभा गाजवणाऱ्या ज्योती वाघमारेंना नडणारे आणि उलट सवाल करणारे जिल्हाधिकारी Kumar Ashirwad यांच्याविषयीची माहीती आपण घेणार आहोत. हे तेच कलेक्टर आहेत ज्यांनी अजित दादा आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या सोलापुर जिल्हात झालेल्या कॉलनंतर मुरुम उपसा करणाऱ्या गावकऱ्यांवर खटला दाखल केला होता. इतकचं नाही तर विरोधी पक्षाला सुद्धा त्यांनी थेट नडायला मागेपुढे पाहिलं नाही. कुमार आशिर्वाद. ३७ वर्ष वयाचा तरुण अधिकारी गेल्या २ वर्षांपासून सोलापूरचा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतोय. मुळचे झारखंडचे असणारे Kumar Ashirwad यांचं शालेय शिक्षण दार्जीलींग आणि जमशेदपुरला त्यांचं शालेय शिक्षण पुर्ण केलं. त्यांचं गाव इतक्या दुर्गम भागात होतं की चुकुन एखाद्या घरी लाईटची सोय होती. अशात टिव्ही, इंटरनेट लांबची गोष्ट. पुढे जाऊन आयआयटी खरगपुर मधून त्यांनी बीटेक इंजीनीअरींग पुर्ण केली. २०११ पासून प्रशासकीय सेवेत रुजु होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुरवातील सलग ४ वेळा युपीएसी मध्ये अपयश आलं. अखेर २०१६ मध्ये संपुर्ण देशात ३५ वी रॅंक मिळवत कलेक्टर होण्याचं स्वप्न साकार केलं. सोलापूर मद्ये ते २०२३ मध्ये कलेक्टर म्हणून रुजु झाले आहेत. पण त्यापूर्वी महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्हात त्यांच पोस्टींग होतं. जिल्हा परिषदेचे सिईओ म्हणून त्यांनी काम पाहिलं. सोलापुरचे कलेक्टर झाल्यापासून अनेक कामांमुळे त्यांचं कौतूक झालं. त्यामद्ये पर्यटनाला चालणा देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असोत नाहीतर मंग सोलापूर मध्ये विमानसेवा सुरु होण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न यामुळे त्यांचं नेहमीच कौतुक झालं आहे. आत्ता सध्या ज्यावेळी इतिहासात पहिल्यांदा सोलापुरमध्ये नदीला पुर आलेला आहे. त्यावेळी सुद्धा त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच लोकांचा जीव वाचू शकला असं सर्वांचं मत आहे. त्यांच्या कार्यापद्धतीचं सगळीकडेच कौतुक होतं आहे. पण या सगळ्यात राजकीय नेत्यांचा अडसर नाही झाला किंवा अधिकारी असुन नेत्यांनी दमदाटी नाही केली तर नवलच. त्यामुळेच त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. एक नाही तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे नडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे. काय आहेत हे दोन्ही विषय चला समजून घेऊया. मागच्या काही दिवसात उपमुख्यमंत्री Ajit Pawar नी केलेला महिला पोलीस अधिकाऱ्याला कॉल चांगलाच व्हायरलं झाला होता. त्यामध्ये अवैध मुरुमउपशावरची कारवाई थांबवण्याची सुचना अजित पवार यांनी त्या अधिकाऱ्याला दिली होती. मिडीयाने हा विषय लावून धरल्यावर त्याचा तपास जिल्हाधिकारी Kumar Ashirwad यांच्याकडे गेला. आएएस अंजली कृष्णा यांनी दादांच्या फोन नंतर कारवाई थांबवलीही होती. मात्र यानंतर तपासात जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी हा मुरुम उपसा अवैध असल्याचच सांगीतलं. आणि याच्यामुळेच गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. एकप्रकारे दादांनी केलेला फोन आणि कारवाई थांबवण्याच्या सुचना गैर असल्याचं यातून समोर येत होतं. म्हणजे आपल्या प्रशासकीय ताकदीचा वापर करुन इथे अजित दादांना अप्रत्यक्षपणे नडण्याचाच प्रयत्न याठिकाणी त्यांनी केला होता. अशात आता सोलापूर मद्ये पुराने थैमान घातल्यानंतर परिस्थिती हाताळताना त्यांना राजकीय नेंत्यांच्या दबावालाही सामोरं जावं लागत होतं. अशात जिल्हाचे पालकमंत्री भरणे मामांनीही उंदरगावच्या लोकांना सुविधा कसकाय पोहोचल्या नाहीत म्हणून मिडीयासमोर कॉल करुन त्यांना झापलं. त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एका पुरग्रस्त गावात २०० किटचं वाटप करण्यासाठी आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या यांनी कलेक्टर कुमार आशिर्वाद यांना सर्वांसमोर फोन लावला, तो स्पिकर वर ठेवला आणि त्याची व्हिडिओही रेकॉर्डींग सुरु होती. तुम्ही लोकांना जास्त पैशाची मदत द्या. लगेच जेवण पोहोच करा. असं सांगणाऱ्या वाघमारेंना तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत का करत नाही. आम्ही इथं काम करत आहोत. तुमचं राजकारण मध्ये आणु नका. २०० किटने काय होतं. तिथं लोकं किती आहेत. असा प्रतिसवालच त्यांनी केला. सहसा कोणत्याही अधिकाऱ्याकडून अशी भाषा कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांसाठी वापरली जात नाही. मात्र मी कलेक्टर आहे माझं तुम्ही ऐकुन घ्या म्हणत कुमार आशिर्वाद यांनी ज्याोती वाघमारेंची बोलतीच बंद केल्याचं व्हिडिओत दिसुन येत आहे. या व्हिडिओमुळे त्या इतक्या ट्रोल झाल्या की त्याच्यावर एक दुसरा व्हिडिओ बनवून त्यांना पोस्ट करावा लागला. माध्यमांनी चमकोगीरी करणाऱ्या वाघमारेंना कलेक्टरांचे खडेबोल अशा मथळ्याच्या बातम्या पोस्ट केल्या. थोडक्यात काय तर अजित दादांची राष्ट्ववादी असो नाहीतर शिंदेंची शिवसेना या कलेक्टर साहेबांनी कुणालाच सुट्टी दिली नाही. एवढंच काय विधानसभेनंतर ज्या मारकडवाडीचं प्रकरण मतचोरी झाली म्हणून विरोधीपक्षाने उचलुन धरलं होतं. तेव्हा कलेक्टर असणाऱ्या Kumar Ashirwad यांनी पत्रकार परिषद घेऊन. तुम्हाला आक्षेप होता तर तुमचे निवडणून प्रतिनिधी मतदान केंद्रावर मोजणीच्या वेळी असताना तुम्ही का नाही घेतला. शिवाय तुम्हाला मोजणीवर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे पण बॅलेट पेपर किंवा कशीही निवडणूक घेण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे. असं स्पष्टपणे सुनावत, तुमच्याकडे पुरावे असले तर आणा. असा दावाही त्यांनी केला होता. Jyoti Waghmare Viral Video : ज्योती वाघमारे बरोबर की सोलापुरचे कलेक्टर Kumar Ashirwad