Bacchu Kadu
आजच्या बातम्या

Bacchu Kadu यांच्या आंदोलनातील १७ महत्त्वाच्या मागण्या

महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते Bacchu Kadu यांनी आपल्या आक्रमक आणि थेट शैलीने पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधले आहे. शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, ओबीसी आणि धनगर समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवत त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून, राज्यभरातून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळतो आहे. आंदोलनाची पार्श्वभूमीBacchu Kadu नी हे आंदोलन राष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी केवळ नाही, तर त्या राज्यातल्या वंचित, दुर्बल सामाजिक घटकांच्या हक्कासाठी सुरू केलं आहे. त्यांचा आरोप असा आहे की शासन फक्त घोषणा करत आहे, पण अंमलबजावणी होत नाही. म्हणूनच त्यांनी आंदोलनाचं शस्त्र हाती घेतलं आहे. या आंदोलनात १७ ठोस मागण्या समाविष्ट असून त्या समाजाच्या मूलभूत गरजांशी संबंधित आहेत. चला पाहूया त्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत: Bacchu Kadu च्या आंदोलनात महात्वाच्या मागण्याशेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी. दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा ₹6000 मानधन देण्यात यावे. आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि शेतमालाला MSP पेक्षा 20% अनुदान द्यावे. 06 एप्रिल 2023 रोजीच्या बैठकीच्या इतिबृत्तावरून शासन निर्णय त्वरित जाहीर करावा. गोरगरीब, वंचित घटकांना सन्मानजनक घरकुल मिळावं. ग्रामीण भागात घरकुलासाठी रु. 5 लाखाचे अनुदान लागू करावे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापून ₹10 लाख मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी. मजुरांना MREGS मध्ये समाविष्ट करून ₹1000 मजुरी द्यावी. संजय गांधी योजनेंतर्गत मंजूर रक्कम तात्काळ लाभार्थ्यांना मिळावी. शेतकरी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू करावी. 100% दिव्यांगांना शासकीय नोकरीत 5% आरक्षण लागू करावे. OBC आरक्षण 27% ठेवून नोकरभरतीत त्यांना संधी द्यावी. शेतमाल विमा योजना थेट खात्यावर लागू करावी व शासनाने 50% हप्ता द्यावा। शेतकऱ्यांना खत व बियाणे विनामूल्य द्यावे. शेती वीज बील माफ करून नियमित वीजपुरवठा द्यावा. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभवत मिळालेल्या किंमती वाजणीवर शेतमाल खरेदी केली जावी. धनगर समाजाला तत्काळ 13% आरक्षण लागू करावी. राज्यभरातून मिळतोय पाठिंबाया मागण्या केवळ विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित नसून, त्या विविध सामाजिक घटकांच्या मूलभूत गरजांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळेच राज्यभरातून विद्यार्थी, महिला, शेतकरी, दिव्यांग आणि राजकीय नेते या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. नुकतेच राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी बच्चू कडूंशी फोनवर संपर्क साधत त्यांची प्रकृती जपण्याचा सल्ला दिला. नितेश कराळे मास्तरांनी हे संभाषण घडवून आणले. हे सरकारकडून काही हालचाल होण्याच्या संकेतांपैकी पहिले पाऊल मानले जात आहे. सरकारची भूमिका आणि पुढील वाटचालराज्य सरकारने या मागण्यांबद्दल अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. तथापि, समाजातील तळागाळातील लोकांचे हे प्रश्न असून, त्यावर लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे असी भावना जनतेमध्ये आहे. जर सरकारने यावर तत्काळ निर्णय घेतला नाही, तर या आंदोलनाची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. Bacchu Kadu हे केवळ आंदोलनकर्ते नेते नसून, ते जनतेच्या वेदनांचे प्रतिनिधी म्हणून पुढे आले आहेत. Santosh Deshmukh Case: Valmik Karad ची संपत्ती जप्त होणार? जन्मठेप होऊ शकते पण कायदा काय सांगतो ?

Jayant Patil
आजच्या बातम्या

Jayant Patil यांच्यावर पडळकरांचा जोरदार हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची विनंती केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर यांनी Jayant Patil यांच्यावर जहरी टीका करताना त्यांची तुलना ‘विझणाऱ्या दिव्या’शी केली आहे. कोल्हापुरात झालेल्या सभेत पडळकरांच्या वक्तव्यांनी मोठी खळबळ उडवली आहे. Jayant Patil – एक संपलेलं पर्व?Jayant Patil महाराष्ट्राच्या राजकारणात पंधराव्या दशकापासून सक्रीय आहेत. प्रभावशाली नेते म्हणून सांगली जिल्ह्यातील त्यांची ओळख आहे. तरी अलीकडच्या काळात त्यांच्यावर लोकप्रियता आणि प्रभाव कमी होत चालल्याची चर्चा होत आहे. ज्यामुळे त्यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची विनंती शरद पवार यांच्याकडे केली. व्यासायिक माणसे असूनही, त्यांनी असा निर्णय का घेतला हे समजत नाही असे म्हणाले पडळकर आणि त्यांनी त्यांचे राजीनामा गांभीर्याने वाटत नाही असे म्हणाले. आता जयंतराव राजकारणात संपलेला विषय आहे असे म्हणाले. गोपीचंद पडळकरांची जहरी टीकाकोल्हापूर येथील भाषणात पडळकरांनी टीकेची झोड उठवताना पाटलांवर वैयक्तिक टीकाही केली. “Jayant Patil हा अनुकंपा तत्त्वावर राजकारणात आलेला कार्यकर्ता आहे. त्यांनी कुठलाही संघर्ष केला नाही. सांगलीसाठी मोठा प्रकल्प आणलेला नाही. इतकी वर्षे VIP मंत्री म्हणून राहिले. दिवा विझताना मोठा होतो, तशी अवस्था आता त्यांची झाली आहे,” अशा शब्दात पडळकरांनी आपला रोष व्यक्त केला. उन्होंने अन्य एक उदाहरणातून पाटलांची स्थिती स्पष्ट केली – “सायकलचं पंक्चर निघालं तर ते काढता येतं, पण टायर फुटल्यानंतर टायर बदलावाच लागतो, तशी स्थिती जयंत पाटलांची आहे.” रायगड वरील धनगर समाजाच्या घरांचा मुद्दाकोल्हापुर भाषणामध्ये पडळकरांनी धनगर समाजाचा मुद्दाही उपस्थित केला. रायगड किल्ल्यावरील धनगर समाजाच्या घरांवर पुरातत्त्व खात्याने दिलेल्या नोटिशीवर त्यांनी संताप व्यक्त केला. “स्वराज्यात धनगर समाजाचा मोठा वाटा आहे. महाराजांच्या काळात गुप्त माहिती पोहचवण्याचं काम या समाजाने केलं आहे. अशा समाजाला रायगडावर घरं बांधू द्या,” अशी मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे हे प्रकरण पोहोचवण्याचा इशाराही दिला. बच्चू कडूंना सल्लाबच्चू कडू यांनी आणलेल्या अन्नत्याग आंदोलनावरही पडळकरांनी आणि आला विचार. “बच्चू कडू हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांचं आंदोलन योग्य मुद्द्यांसाठी आहे. मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवावा. त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत,” असा सल्ला पडळकरांनी दिला. राष्ट्रवादीतील नव्या नेतृत्वाची वाटJayant Patil यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटात नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे की, आगामी पालिका निवडणुकांनंतरच नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली जाईल. त्यामुळे सध्या तरी पाटील यांची मागणी फक्त सूचक मानली जात आहे. Jayant Patil यांच्या मागणीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा रंगली आहे, तर गोपीचंद पडळकर यांनी या घडामोडींना आक्रमक प्रतिक्रिया देत राजकारणात नवा वाद निर्माण केला आहे. त्यांच्या भाषणाने राजकीय वातावरण तापले आहे. धनगर समाजाचा मुद्दा, बच्चू कडूंचं उपोषण आणि जयंत पाटील यांची भूमिका – या साऱ्याच मुद्द्यांवर पडळकरांनी आपली भुमिका ठामपणे मांडली आहे. Bachchu Kadu यांचे अन्नत्याग आंदोलन। म्हणाले, अंत्ययात्रा निघाली तरी चालेल! पण मागण्या काय आहेत ?