cloud Burst की अतिवृष्टी? महाराष्ट्रातील पुरामागचं खरं कारण जगात १ मिनिटात ३६ मिमी, ५ मिनिटात ६६ मिमी, १५ मिनिटात २०० मिमी, १ तासात ४०० मिमी, १ दिवसात ११०० मिमी आणि दोन दिवसात १८०० मिमी पावसाचे रेकॉर्ड आहेत. मुंबईचा २६ जुलैचा दिवसभरात पडलेला १००० मिमी पाऊस सुद्धा ढगफुटीचा प्रकार होता. अशा परिस्थितीत १५ किलोमीटर उंचीचे ढग तयार होतात. आणि ते इतक्या कमी वेळात कोसळतात की दरड कोसळणे आणि भयंकर पुर येणे या घटना त्यातून घडतात. आता विषय असा आहे की महाराष्ट्राच्या अनेक भागात जो पुर येतोय तो आधिच धरणं ही भरलेली आहेत. अशात पाण्याचा साठा आणि जमीनीची धारण करण्याची क्षमता संपल्यामुळे होतोय. ते दिवसभरात ५०-६० मिलीमीटर पाऊस झाला तरी होत आहे. खडकवासला सारखं धरण ज्याची क्षमता बाकी धरणांच्या तुलनेत कमी आहेत. शिवाय डोंगरमाथ्याला झालेला पाऊस लगेच धरणात पोहोचतो. त्यामुळे ते लगेच भरत. पण म्हणून त्यातून झालेल्या विसर्गाला ढगफुटी कारणीभुत नसते. पोखर्णी गावातील परंपरेचा शेकडो वर्षांचा इतिहास | Historic village Pokharni .